Raosaheb Danve On Lathicharge: वातावरण पाहून परिस्थिती हँडल केली, पण जालना पोलिसांचा लाठीचार्ज चुकीचाच- रावसाहेब दानवे

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 10:48 PM IST

thumbnail

जालना Raosaheb Danve On Lathicharge : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवली येथे मराठा आंदोलकांना झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणी संपूर्ण राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. या सर्व बाबींचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतलीय. जखमींची विचारपूस केलीय. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत संवाद साधलाय. यावेळी रावसाहेब दानवे म्हटले की, कुठल्याही प्रकारचा वरून कॉल आलेला नाही. ज्या वेळेस ही घटना घडली, त्यावेळेस पोलिसांनी वातावरण पाहून परिस्थिती हँडल केलीय. मारहाण केली आहे, हे चुकीचं आहे. ते करायला नको होतं, अशा शब्दात त्यांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केलीय. तसंच भाजपाच्या वतीनं त्यांनी मत व्यक्त केलंय की, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. या गोष्टीवर आम्ही ठाम आहोत. पण, कायद्याच्या चौकटीत राहूनच आरक्षण मिळालं पाहिजे. ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत, ते सरकारला मागे घेण्याचा अधिकार असल्यास कायदेशीर बाजू तपासून मागे घेतले जातील, असं त्यांनी सांगितलंय. (Lathicharge On Maratha Protesters in Jalna)

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.