महाराष्ट्राच्या नवदुर्गा - राजकारणातील बारा वर्षांचा प्रवास सांगत आहेत राज्याच्या उद्योगमंत्री आदिती तटकरे

By

Published : Oct 14, 2021, 10:39 AM IST

Updated : Oct 14, 2021, 11:54 AM IST

thumbnail

मुंबई - नवरात्रीनिमित्त महाराष्ट्राच्या नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात आपण कर्तबगार महिलांशी संवाद साधत आहेत. यावेळेस ईटीव्ही भारतचे मुंबईतील मुख्य प्रतिनिधी सुरेश ठमके यांनी राज्याच्या उद्योमंत्री आदिती तटकरे यांच्याशी बातचीत केली. या मुलाखतीत त्यांनी सध्या राज्यातील राजकारणाची परिस्थिती, बारा वर्षांचा प्रवास उलगडून दाखवला. तसेच राजकारणात येण्याचे कसे ठरवले याबद्दलही सांगितले. मी राजकारणात येईन असे कधीच वाटले नाही. पण, 2009 राजकारणाची खरी सुरूवात झाली. तेव्हा श्रीवर्धन मतदारसंघात तटकरे साहेब उमेदवार म्हणून होते. तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रचारक म्हणून होते. तेथील युवकांसोबत काम करण्याची संधी मिळाली. नंतर 2012 मध्ये नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस युवतीची स्थापना करताना माझ्यारडे जिल्हा युवती म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

Last Updated : Oct 14, 2021, 11:54 AM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.