ETV Bharat / state

सूत गिरणी कामगाराची आत्महत्या,अडीच महिन्यांपासून मिळाले नव्हते वेतन

author img

By

Published : Jan 12, 2020, 2:34 AM IST

Updated : Jan 12, 2020, 3:35 AM IST

labour-commit-suicide in wardha
सूत गिरणी कामगाराची आत्महत्या,अडीच महिन्यांपासून मिळाले नव्हते वेतन

सेवाग्राम येथील बापूराव सूत गिरणीच्या कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आर्थिक विंवचेनला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे मृत्युपुर्वी लिहलेल्या चिट्ठीतुन उघडकीस आली आहे.ओमप्रकाश अंबादास येसनकर (५०) असे मृताचे नाव आहे.

वर्धा - सेवाग्राम येथील बापूराव सूत गिरणीच्या कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आर्थिक विंवचेनला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे मृत्युपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीतुन उघडकीस आले आहे. ओमप्रकाश अंबादास येसनकर (५०) असे मृताचे नाव आहे.

सूत गिरणी कामगाराची आत्महत्या,अडीच महिन्यांपासून मिळाले नव्हते वेतन

ओमप्रकाश येसनकर हे अनेक वर्षांपासून बापूराव सूतगिरणीत कंत्राटी पध्दतीने काम करत होते. त्यांच्या घरातील परिस्थिती बेताची होती. घरातील सदस्य आणि होणारा घरखर्च पाहता त्यांची आर्थिक स्थिती बिघडली होती. अशा परिस्थितीत त्यांना मागील अडीच महिन्याचे वेतन मिळाले नव्हते. कंत्राटदार वेतन देण्यास टाळाटाळ करत असल्याने ते हतबल झाले होते. त्यामुळे त्यांनी कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलले.

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी पत्नीच्या नावे चिठ्ठी लिहून त्यात मी निघून जात असल्याचे नमूद केले. दरम्यान त्यांच्या पत्नीने ते बेपत्ता होण्याची तक्रार सेलू पोलिसात दिली होती. पोलिसांनी तपास केला असता सेवाग्राम रुगणलयाच्या मागील बाजूस असलेल्या अवळीच्या बागेत एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह मिळाला. त्यावेळी पोलिसांना पुन्हा एक चिठ्ठी मिळाली असून यात त्यांनि वेतन न मिळाल्याचा उल्लेख केला असल्याची माहीती समोर आली आहे. तसेच त्यांनी कंत्राटदाराचाही उल्लेख केला. शनिवारी त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले होते मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह घेण्यास नकार दिला देत, जोपर्यंत कंत्राटदारास अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयानी नकार दिला. तसेच आर्थिक मदत देण्याची मागणी रेटून धरली. अखेर ठाणेदार कांचन पांडे यांनी योग्य कारवाईच आश्वासन दिल्यानतंर मृतदेह कुटुंबीयांना देण्यात आला.

हेही वाचा - तारापूर एमआयडीसी स्फोट: राज्य शासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

Intro:mh_war_atmhatya_pkg_7204321

बाईट - कांचन पांडे, पोलिस निरिक्षक सेवाग्राम

आर्थिक विवंचनेतुन आत्महत्या, आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीतुन खुलासा

- अडीच महिन्यापासून थकीत होते वेतन
- कंत्राटदाराकडून होत होती टाळाटाळ
- गळफास घेऊन केली आत्महत्या
- आत्महत्यापूर्वी लिहले होते वेतनाचे कारण


वर्ध्याच्या सेवाग्राम येथील बापूराव सूत गिरणीच्या कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. सेवाग्राम दवाखाण्याचे मागे झुडपीत मृतदेह आढळून आला. आर्थिक परिस्थितीला कंटाळून करत असल्याचे मारणापूर्वी लिहलेल्या चिट्ठीतुन उघडकीस आलेय. ओमप्रकाश येसनकर असे मृतकाचे नाव आहे.


ओमप्रकाश अंबादास येसनकर (५०) हा अनेक वर्षांपासुन बापूराव सूतगिरणीत कंत्राटी पध्दतीने काम करत होता. त्याच्या घरातील

परिस्थिती जेमतेम असताना घरातील सदस्यांची प्रकृती तसेच आर्थिक खर्च पाहता आर्थिक घडी बिघडली होती. यात कंत्राटदार मागील अडीच महिन्याचा पगार देतो देतो म्हणून टाळाटाळ करत असल्याचे कागरारांची ओरड आहे. यात ओमप्रकाश याने पत्नीच्या नावे चिठ्ठी लिहून त्यात मी निघून जात असून शेवटचे पत्र असल्याचा मजकूर होता. यात पत्नीने बेपत्ता असल्याची तक्रार सेलू पोलिसात दिली होती. यात मृतदेह सेवाग्राम रुगणलयाच्या मागील बाजूस असलेल्या अवळीच्या बागेत एक झडला मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाला. यावेळी पुन्हा एक चिठ्ठी मिळाली असून यात त्याने वेतन न मिळाल्याचा उल्लेख केला असल्याचे सांगितले. यात कंत्राटदाराचाही उल्लेख केला आहे. यावेळी पोलिसांनी प्रकरण तपासत घेतले असून आज शवविच्छेदन करण्यात आले.

मृतदेह घेण्यास नकार दिला होता. जोपर्यंत कंत्राटदारास अटक करत कुटुंबियाणं आर्थिक मदत देण्याची मागणी रेटून धरण्यात आली. अखेर ठाणेदार कांचन पांडे यांनी योग्य कारवाईच्या आश्वासनानंतर मृतदेह कुटुंबियांना देण्यात आला.



Body:पराग ढोबळे वर्धा.Conclusion:
Last Updated :Jan 12, 2020, 3:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.