ETV Bharat / state

Raksha Bandhan : तरुणाचा डोंबिवली ते कारगिल दुचाकीने प्रवास; 'हे' आहे कारण

author img

By

Published : Aug 15, 2023, 10:21 PM IST

Raksha Bandhan
Raksha Bandhan

'एक राखी बंधन' या संकल्पनेतून (One rakhi Bandhan) डोंबिवलीतील तरुण रोहित आचरेकर दरवर्षी डोंबिवली ते कारगिल असा प्रवास (Rohit Achrekar journey from Dombivli to Kargil) आपल्या दुचाकीवर करतात. आज १५ ऑगस्टच्या निमित्ताने रोहित आचरेकर शेकडो किलोमीटरच्या प्रवासाला निघाले आहेत. यावर्षी त्यांनी सैनिकांसाठी 20 हजार राख्या तसेच 750 किलो मिठाई खरेदी केली आहे.

रोहित आचरेकर यांची प्रतिक्रिया

ठाणे : 'एक राखी बंधन' (One rakhi Bandhan) या संकल्पनेतून डोंबिवलीतील एक बाईकस्वार दरवर्षी डोंबिवली ते कारगिल असा शेकडो किलोमीटरचा प्रवास (Rohit Achrekar journey from Dombivli to Kargil) आपल्या बाईकवर करतो. आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने सीमेवरील जवानांना एक अनोखी भेट देण्यासाठी एक दुचाकीस्वार शेकडो किलोमीटरच्या प्रवासाला निघाला आहे. विशेष म्हणजे यावर्षी त्यांनी सैनिकांसाठी 28 हजार राख्या, 750 किलो मिठाई खरेदी केली आहे.



यासाठी राबविला जातो हा उपक्रम : भारतीय लष्कराचे जवान (Indian Army Soldiers) सीमेवर बलिदान देण्यासाठी सदैव तयार असतात. शिवाय देशाच्या रक्षणासाठी ते कुटुंबापासून दूर राहतात. सीमेवर असताना आपल्या बहिणीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सैनिकांच्या भावना लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती रोहित आचरेकर यांनी दिली. तसेच रोहित आचरेकर शाळेत असताना सैनिकांना शुभेच्छा देणारे पोस्टकार्ड पाठवत असे, पण हे पोस्टकार्ड सैनिकांपर्यंत पोहोचते का? याविषयी त्यांच्या मनात शंका होती. रोहित आचरेकर सांगतात की, या पार्श्‍वभूमीवर सैनिकांसाठी स्वत: काहीतरी करण्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाली. म्हणूनच गेल्या 17 वर्षांपूर्वी हा उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला. रोहित आचरेकर यांच्यासोबत, त्याचा मित्र प्रेम देसाई, ससून गावडे देखील या उपक्रमात सहभागी झाले आहेत.

जवळपास 2500 किलोमीटर करणार प्रवास : डोंबिवली ते कारगिल हा प्रवास करताना ते डोंबिवली, सुरत, अहमदाबाद, जयपुर, उदयपूर , पाली, चंदीगड युनिव्हर्सिटी, हरियाणा, पंजाब, यमुना नगर, दिल्ली मार्गाने दुचाकीने प्रवास करणार आहेत. हा प्रवास जवळपास 2 हजार 500 किलोमीटर आहे, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे विविध राज्यातील रोटरी क्लब तर्फे आम्हाला राख्या देण्यात आल्या असून जवळपास 28 राज्यातून या राख्या, मिठाई आमच्यापर्यंत पोहचल्याचे रोहित आरचेकर यांनी सांगितले. प्रत्येक राज्यात आमची एक टीम असल्याचेही माहिती देखील त्यांनी दिली आहे.

उपक्रमाचे 17 वे वर्ष : गेल्या 20 दिवसांपासून राखी गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. गेल्या पाच वर्षांपासून डोंबिवली ते जम्मू काश्मीर असा प्रवास करत असल्याचे रोहितने यांनी सांगितले. एवढेच नाही तर काही नागरिक परदेशातून थेट जम्मूला राख्या पाठवणार असल्याची माहिती देखील रोहितने यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.