ETV Bharat / state

राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, सदस्यांनी राजीनामा का दिला?-विजय वडेट्टीवार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 12, 2023, 11:08 AM IST

Updated : Dec 12, 2023, 2:19 PM IST

Maharashtra assembly winter session
Maharashtra assembly winter session

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. विरोधकांनी आरोग्यव्यवस्था ललित पाटील ड्रग्ज प्रकरण, मराठा आरक्षण आदी मुद्द्यांवरून सरकारला घेरलं आहे.

नागपूर- विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. विधानपरिषेदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तोंडाला मास्क लावून आणि गळ्यात स्टेथस्कोप घेऊन आरोग्य विभागाच्या कारभाराचा निषेध केला आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.

Live updates

  • राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, सदस्यांनी राजीनामा का दिला? त्यांच्यावर कोणता दबाव होता? असा प्रश्न विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात उपस्थित केला. यायबाबतची माहिती सभागृहाला कळली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. राज्य मागासवर्गीय आयोग हा ओबीसी रक्षणसाठी आहे. हा आयोग स्वायत्त आहे. चार तारखेला या आयोगाचे अध्यक्ष निरगुडे यांनी राजीनामा दिला. राजीनाम्याचे कारण काय? याबाबत सभागृहाला माहिती मिळाली पाहिजे, अशी वडेट्टीवार यांनी मागणी केली. या संदर्भात माहिती घेऊन सांगण्यात येईल, असे उत्तर सरकारकडून देण्यात आले.
  • जानेवारी ते जून 2023 या कालावधीत मुंबईत रस्ते अपघातात 147 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं. जानेवारी ते जून या कालावधीत मुंबईत १३२ अपघात झाले आहेत. त्यात १४७ जणांचा मृत्यू झाला आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी जुन्या पेन्शन योजनेबाबत यू टर्न घेतला आहे. जुन्या पेन्शन योजनेबाबत आपण सकारात्मक पुनर्विचार करणार आहोत, असे अर्थमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
  • कॉलेज आणि शाळांमध्ये ड्रग्ज विक्रीच काम सुरू आहे. पैशांच्या आमिषाला लोक बळी पडत आहेत. लहान मुले ड्र्ग्ज घेताना पाहिले आहे. मुलांना पकडून त्यांच्याकडून माहिती घ्यावी. ललितनं काही लोकांना घेऊन ड्र्ग्जची फॅक्टरी सुरू केली असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केला.
  • योग्य कारवाई केली नाही तर पुढची पिढी बरबाद होऊ शकते. मुंबईत अनेक ठिकाणी कारवाई सुरू आहेत. शाळा-कॉलेजजवळील २३६९ टपऱ्या फोडल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विधानपरिषदेत सांगितलं.
  • विधानपरिषदेत ललित पाटील ड्रग्ज प्रकरणाचा विषय चर्चेत आला आहे. काँग्रेसचे आमदार यांनी ड्रग्ज प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांचा हात असू शकतो, असा संशय व्यक्त केला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात १० पोलिसांवर कारवाई कऱण्यात आल्याचं सांगितलं. त्यामध्ये ४ पोलीस बडतर्फ आणि ६ पोलीस निलंबित आहेत. कोकणात वाहून आलेल्या ड्रग्जवर पाकिस्तानचा शिक्का आहे. हे आंतरराष्ट्रीय ड्र्गज असल्याचा संशय गृहमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. ललित पाटील प्रकरणात कोणाही माफी मिळणार नाही, याची ग्वाही गृहमंत्री फडणवीस यांनी दिली.
  • अवकाळीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे. याबाबत मुख्यमंत्री शुक्रवारी घोषणा करणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सभागृहात सांगितले.
  • शिंदे समिती पहिला अहवाल ३१ ऑक्टोबरला सादर करणार आहे. ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तारांकित प्रश्नावर दिली.

अधिविशनाच्या तिसऱ्या दिवशी काय झाले? हिवाळी अधिवेशनातील दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या आठवड्यातील पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. बळीराजा संकटात असताना हे सरकार फक्त घोषणा आणि स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. शेतकऱ्यांना कोणतीच मदत केली जात नाही. शेतकरी विरोधी धोरण सरकारचे असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. राज्यात दररोज सात शेतकरी आत्महत्या करत आहेत. विदर्भ-मराठवाड्यात शेतकऱ्यांनी सर्वाधिक आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू सरकारला दिसत नाहीत. सरकारचे निर्णय अत्यंत चुकीचे असल्याची टीका वडेट्टीवार यांनी सरकारवर केली.

सरकारने निर्यातबंदी हटवावी- पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, कांदा निर्यातीचा सरकारचा निर्णय शेतकऱ्यांना डबघाईत नेणारा आहे. सरकारने जबाबदारी झटकू नये. संत्रा, तांदूळ, कांदा निर्यातीचा सरकारचा निर्णय शेतकऱ्यांना संकटात टाकणारा आहे. तांदळाची निर्यात थांबल्यामुळं कोट्यावधीचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांची लूट थाबली पाहिजे. शेतकऱ्यांना हमीभावाचे फक्त गाजर दिले. कोणत्याच शेतकऱ्यांच्या वस्तुला हमीभाव मिळत नाही, ही खेदाची बाब आहे. कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा वेदना सरकारला समजत नसतील तर, हे दुर्देव आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. शेतकरी संकटात असताना, नियम आणि निकष यावर सरकार बोलत आहे. मागील वर्षीची मदत अजून शेतकऱ्यांना मिळाले नाही. शेतकऱ्यांचे कर्ज अजूनही माफ झाले नाही. सरकारने पाठ थोपटून घेतली. फक्त घोषणांचा पाऊस पडत आहे. मात्र शेतकरी मदतीपासून वंचित आहे, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी केला.


शेकडो विद्यार्थी हे वीटभट्ट्यांवर काम करतात- राज्यातील शाळाबाह्य मुलांच्या आणि स्थलांतरित मुलांच्या प्रश्नाने गंभीर रूप धारण केले आहे. शेकडो विद्यार्थी हे वीटभट्ट्यांवर काम करताना दिसत आहेत. तर कित्येक विद्यार्थी भीक मागताना दिसत आहेत. मात्र त्याचे सरकारला अजिबात गांभीर्य नाही. शाळाबाह्य मुलांच्या या निर्माण झालेल्या प्रश्नाला राज्य सरकारच्या नगर विकास विभाग, महिला बालविकास विभाग आणि शालेय शिक्षण या तीन विभागांमध्ये समन्वय नसल्यामुळेच ही परिस्थिती ओढवल्याचा गंभीर आरोप यशोमती ठाकूर यांनी सोमवारी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला. विदर्भातील मेळघाटातील स्थलांतरित विद्यार्थ्यांसाठी एक विशेष ॲप आपण महिला आणि बालविकास मंत्री असताना तयार केले होते. या ॲपचे पुढे काय झाले? या ॲपचा वापर सरकार का करत नाही? स्थलांतरित मुलांसाठी विशेष तयार करण्यात आलेले हे ॲप सरकार केव्हा कार्यान्वित करणार आहे, असा सवाल यावेळी ठाकूर यांनी उपस्थित केला.

हेही वाचा-

  1. 'मोदी गॅरंटी आहे', लवकरच अखंड हिंदुस्थानचं स्वप्न देखील पूर्ण होईल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  2. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अर्थकारणावर परिणाम होणारी कोणती विधेयकं मंजूर झाले? जाणून घ्या सविस्तर
Last Updated :Dec 12, 2023, 2:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.