मुंबई - सभागृहात आज माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार भाषण केले. मुनगंटीवार यांनी कवितेच्या माध्यमातून सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी कवितेतून सरकारवर आसूड ओढला. अंतिम आठवडा प्रस्तावर चर्चा सुरु असताना मुनगंटीवार बोलत होते.
सभागृहात आज बोलताना मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. ही अभद्र युती असल्याचे त्यांनी म्हटले. जनतेची काम करा नाही तर जनता करेल सुफडा साफ अशा आशयाची कविता त्यांनी सभागृहात म्हणून दाखवली. शपथनामा, वचनमामा यामध्ये दिलेले वचन केव्हा पूर्ण करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार आणि बागायती शेतील हेक्टरी ५० हजार रुपये देण्याचे सरकारने आश्वासन दिले होते. ते आश्वासन कधी पूर्ण करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शेतीसाठी सरकारला सकारात्म पाठिंबा द्यायला तयार असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. तसेच शेतकरी प्रश्नावर राजकारण करायचे नसल्याचे मुनगंटीवार म्हणाले.