ETV Bharat / state

Ajit Pawar On Barsu Refinery : बारसू रिफायनरी प्रकल्पाचा फेरविचार करण्याची गरज- अजित पवार

author img

By

Published : Apr 28, 2023, 7:16 PM IST

Updated : Apr 28, 2023, 8:29 PM IST

Ajit Pawar
अजित पवार

रत्नागिरीतील बारसू रिफायनरी प्रकल्पावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची प्रतिक्रिया प्रतिक्रिया दिली आहे. 'ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच पत्र दिले आहे. आता उद्धव ठाकरेंनी आपण जनतेसोबत असल्याचे म्हटले आहे. जनता विरोधात असल्याने प्रकल्पाला विरोध करत असल्याची उद्धव ठाकरेंची भूमिका आहे. त्यांची भूमिका', अशी प्रतिक्रिया विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे.

अजित पवारांची पत्रकार परिषद

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला रत्नागिरीतील प्रस्तावित रिफायनरीविरोधातील सार्वजनिक आंदोलन शांततेच्या मार्गाने हाताळण्याचे आवाहन केले आहे. बारसू रिफायनरी प्रकल्पाचा वाद चिघळत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. विकासकामांच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नेहमीच सकारात्मक राहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका तुम्ही ऐकलीच असेल. पण वातावरण बिघडत असेल तर प्रकल्पाचा फेरविचार व्हायला हवा, असं अजित पवार म्हणाले.

प्रकल्पाचा पुनर्विचार झाला पाहिजे : माझ्या माहितीनुसार, उदय सामंत यांनी मला काल सांगितले की एकही घर आम्हा तोडत नाहीत. ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांना योग्य मोबदला मिळायला हवा, इतर राज्यातील लोकांनी जमिनी घेऊन तिथे ठेवल्याच्या बातम्याही आपण ऐकत आहोत. स्थानिकांना फायदा होणार असेल तर तो स्थानिकांसाठीच व्हायला हवा असे, अजित पवार म्हणाले, 'नुकसान होणार असेल, पर्यावरणाचा ऱ्हास होणार असेल, तर प्रकल्पाचा पुनर्विचार झाला पाहिजे' अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली आहे.

चर्चेतून तोडगा काढावा : रत्नागिरी जिल्ह्यातील रिफायनरी प्रकल्पाविरोधात स्थानिकांनी केलेला विरोध संवेदनशीलतेने हाताळला जावा आणि जोपर्यंत समाधानकारक तोडगा निघत नाही तोपर्यंत राज्य सरकारने सर्वेक्षण थांबवावे, अशी मागणी केली. प्रशासनाने सुरू केलेल्या प्रस्तावित रिफायनरीसाठी मातीच्या गुणवत्तेच्या सर्वेक्षणाला स्थानिकांनी विरोध केला आहे. पवार म्हणाले, जिल्ह्यातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा आवाज दडपण्याचा प्रकार थांबला पाहिजे. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आंदोलकांना अटक केली जात आहे. सरकारने स्थानिकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे आणि संवेदनशीलतेने हा प्रश्न सोडवला पाहिजे,' असे पवार म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेतून तोडगा काढावा, असे पवार म्हणाले. तोपर्यंत सर्वेक्षण थांबवावे, असे ते म्हणाले.

हेही वाचा - Barsu Refinery Row : बारसू रिफायनरी आंदोलन चिघळले; पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज, आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित

Last Updated :Apr 28, 2023, 8:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.