ETV Bharat / state

गणेश विसर्जन : तब्बल २२ तासांच्या भव्य मिरवणुकीनंतर लालबागचा राजा अरबी समुद्रात विसावला

author img

By

Published : Sep 13, 2019, 10:30 AM IST

Updated : Sep 13, 2019, 12:15 PM IST

गणेश विसर्जन : तब्बल २२ तासांच्या भव्य मिरवणुकीनंतर लालबागच्या राजा अरबी समुद्रात विसावला

नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागचा राजा प्रसिद्ध आहे. प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही राजाची भव्य अशी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी लाडक्या गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी भक्तांचा जनसागर लोटला होता. गेले अकरा दिवस भक्तिभावे पूजा करताना गणेशभक्तांमध्ये उत्साह असला, तरी साश्रू नयनांनी बाप्पाला निरोप देण्यात आला.

मुंबई - गणपती बाप्पा मोरया.. पुढल्या वर्षी लवकर या जयघोषात मुंबईतील नवसाला पावणारा गणपती म्हणजे लालबागच्या राजाचे मुंबईतील गिरगाव चौपाटीवर आज (शुक्रवारी) सकाळी साडे आठच्या सुमारास विसर्जन करण्यात आले. १० दिवसाच्या गणेशोत्सवानंतर गुरुवारी अनंत चतुर्दशी दिवशी सकाळी १० वाजताच्या आरतीनंतर राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली होती. दरम्यान तब्बल २२ तासानंतर लालबागच्या राजाचे आज विसर्जन करण्यात आले. यावेळी उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी देखील उपस्थित होता.

गणेश विसर्जन : तब्बल २२ तासांच्या भव्य मिरवणुकीनंतर लालबागचा राजा अरबी समुद्रात विसावला

हेही वाचा - पुनरागमनाचे अभिवचन घेऊनच मुख्यमंत्र्यांनी केले गणरायाचे पर्यावरणपूरक विसर्जन

नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागचा राजा प्रसिद्ध आहे. प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही राजाची भव्य अशी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. तर पहाटे 5.30 दरम्यान लालबागच्या राजाची मिरवणूक गिरगाव चौपाटी येथे पोहोचली. यावेळी मोठा जनसागर राजाला निरोप देण्यासाठी आला होता. यावेळी लाडक्या गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी भक्तांचा जनसागर लोटला होता. गेले अकरा दिवस भक्तिभावे पूजा करताना गणेशभक्तांमध्ये उत्साह असला, तरी साश्रू नयनांनी बाप्पाला निरोप देण्यात आला.

Intro:मुंबई ।
हजारो भाविकांच्या जयजयकारात आज सकाळी साडे आठच्या सुमारास लालबागचा राजाचे
गिरगाव चौपाटी येथे विसर्जन झाले. राजाला निरोप देण्यासाठी मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी देखील उपस्थित होता.Body:पहाटे 5.30 दरम्यान लालबागच्या राजाची मिरवणूक गिरगाव चौपाटी इथे पोहचली. मोठा जनसागर यावेळी राजाला निरोप देण्यासाठी आला होता. लालबागच्या राजाचा विजय असो, असा जयघोष सुरूच होता. निरोप देताना अनेकांचा कंठ दाटून आला होता.

22 तास मिरवणूक सुरू होती. ज्या ठिकाणाहून मिरवणूक गेली तेथे राजाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यानंतर गिरगाव चौपाटीवर मिरवणूक पोहोचली. सज्ज अशा बोटीत मूर्ती बसवून समुद्रात मध्यभागी नेऊन विसर्जन करण्यात आले.

Conclusion:
Last Updated :Sep 13, 2019, 12:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.