ETV Bharat / city

पुनरागमनाचे अभिवचन घेऊनच मुख्यमंत्र्यांनी केले गणरायाचे पर्यावरणपूरक विसर्जन

author img

By

Published : Sep 12, 2019, 7:46 PM IST

पुनरागमनाचे अभिवचन घेऊनच आपण लाडक्या गणरायाला निरोप देत असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्र्यांनी केले गणरायाचे पर्यावरणपूरक विसर्जन

मुंबई - राज्यात गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला गणेशभक्त निरोप देत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वर्षा निवासस्थानी बसवलेल्या गणरायाचे पर्यावरणपूरक विसर्जन केले आहे.

  • गणरायाला निरोप देण्याचा आजचा दिवस,
    अर्थात पुनरागमनाचे अभिवचन घेऊनच !

    ‘वर्षा’ निवासस्थानी आज गणरायाचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. #GanpatiBappaMorya pic.twitter.com/oMWO8jy6qj

    — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - LIVE MUMBAI : 'लालबागचा राजा' चिंचपोकळी पुलावर, गणेश गल्लीचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

पुनरागमनाचे अभिवचन घेऊनच आपण लाडक्या गणरायाला निरोप देत असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणरायाची गेली 11 दिवस मनोभावे पूजा करण्यात आली होती. आज लाडक्या बाप्पाला मुख्यमंत्र्यांनी भावपूर्ण निरोप दिला.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.