ETV Bharat / state

विविध मागण्यांसाठी ब्राह्मण समाजाचे जालन्यात धरणे आंदोलन

author img

By

Published : Jan 20, 2020, 6:17 PM IST

आंदोलनात सहभागी नागरिक
आंदोलनात सहभागी नागरिक

विविध मागण्यांसाठी ब्राह्मण समाजातील नागरिकांनी जालन्यातील गांधीचमन चौकात चार तास धरणे आंदोलन केले.

जालना - ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षण मोफत मिळावे, समाजातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह स्थापन करावे, यांसह विविध मागण्यासांठी आज (दि. 20 जाने.) शहरातील गांधीचमन येथे चार तास धरणे आंदोलन करण्यात आले.

आपले म्हणणे मांडताना विद्यार्थीनी

ब्राह्मण समाजाचा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय देव पूजा, कर्मकांड, पौरोहित्य हे पारंपारिक व्यवसाय ग्रामीण भागातून कालबाह्य झाले. त्यामुळे ब्राह्मण समाजाचे अस्तित्व कमी झाले आहे आणि तो शहरी भागाकडे आला. मात्र, उपजीविकेचे साधन नसल्यामुळे आज ब्राह्मणांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. शासकीय नोकरी नाही, खासगी व्यवसाय करण्यासाठी आर्थिक पाठबळ नाही, आरक्षण नसल्यामुळे कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे हा समाज अडचणीत सापडलेला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

वरील मागण्यांसोबतच ब्राह्मण पुरोहितांना 5 हजार रुपये मानधन देऊन त्यांची विविध मंदिरात नियुक्ती करावी, समाजाच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक पातळीवर झालेल्या बदलांचा चांगला व वाईट परिणाम शोधून आयोगाची शासनस्तरावर नेमणूक करावी. ब्राह्मण समाजाच्या महापुरुषांवर होणारी जातीय चिखलफेक थांबून बदनामी विरोधी कायदा करावा. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे. या मागण्यांचा समावेश आहे.

हेही वाचा - ऐतिहासिक शिवकालीन शस्त्रास्त्रांच्या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गांधीचमन येथे झालेल्या धरणे आंदोलनामध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात संख्या दिसत होती दरम्यान या धरणे आंदोलनाला माजी मंत्री अर्जुन खोतकर, भाजपचे शहराध्यक्ष राजेश राऊत, मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन गीते, यांनी स्वतः उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला.

हेही वाचा - जालन्यात कर्ज बाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

Intro:ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षण मोफत मिळावे, समाजातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी, ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वस्तीग्रह स्थापन करावे, या आणि अन्य मागण्यांसाठी सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने आज सोमवारी शहरातील गांधीचमन येथे चार तास धरणे धरून आंदोलन करण्यात आले.


Body:ब्राह्मण समाजाचा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय देव पूजा, कर्मकांड ,पौरोहित्य हे पारंपारिक व्यवसाय ग्रामीण भागातून कालबाह्य झाले, त्यामुळे ब्राह्मण समाजाचे अस्तित्व कमी झाले आहे आणि तो शहरी भागाकडे आला, मात्र उपजीविकेचे साधन नसल्यामुळे आज ब्राह्मणांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. शासकीय नोकरी नाही, खाजगी व्यवसाय करण्यासाठी आर्थिक पाठबळ नाही, आरक्षण नसल्यामुळे कुठल्याही सुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे हा समाज अडचणीत सापडलेला आहे,
वरील मागण्या सोबतच ब्राह्मण पुरोहितांना पाच हजार रुपये मानधन देऊन त्यांची विविध मंदिरात नियुक्ती करावी, समाजाच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक पातळीवर झालेल्या बदलांचा चांगला व वाईट परिणाम शोधून आयोगाची शासनस्तरावर नेमणूक करावी. ब्राह्मण समाजाच्या महापुरुषांवर होणारी जातीय चिखलफेक थांबून बदनामी विरोधी कायदा करावा, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे. या मागण्यांचा समावेश आहे .गांधीचमन येथे झालेल्या धरणे आंदोलनामध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात संख्या दिसत होती दरम्यान या धरणे आंदोलनाला माजी मंत्री अर्जुन खोतकर, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष राजेश राऊत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन गीते, यांनी स्वतः उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. आंदोलनामध्ये सुधाकर लोखंडे, रामदासी महाराज, विलास नाईक, प्रा. एस वि देशपांडे ,दिपक रणनवरे ,आर. आर .जोशी, विनायक महाराज फुलंब्रीकर ,सौ संगीता देशपांडे,सौ. माधुरी दंडे,सौ. कल्याणी कुलकर्णी, सौ. छाया कुलकर्णी आदी महिलांची उपस्थिती होती.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.