ETV Bharat / state

जालन्यात कर्ज बाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

author img

By

Published : Jan 19, 2020, 5:23 PM IST

jalna
जालन्यात कर्ज बाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

सततची नापिकी आणि शेती पिकांच्या उत्पादनात होणाऱ्या प्रचंड घटीमुळे हा शेतकरी संकटात होता. त्याने महाराष्ट्र बँकेच्या गेवराई बाजार शाखेतून आणि महिंद्रा फायनान्सकडून जवळपास अडीच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. यंदाही खरीप हंगामात अत्यल्प उत्पादन झाल्यामुळे हे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत हा शेतकरी होता. त्यातच मुलीचे लग्नाचे वय झाल्याने लग्न कसे करावे या चिंतेत या शेतकऱ्याने आपल्याच शेतात विषारी औषध सेवन केले.

जालना - सततची नापिकी आणि कर्ज बाजारीपणाला कंटाळून बदनापूर तालुक्यातील सागरवाडी येथील एका 38 वर्षीय तरुण शेतकऱ्याने शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली. कचरूसिंग दिवाणसिंग जारवाल, असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्याने शेतातच विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. तरूण शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा - देवगाव-माळेगाव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे; कामाची चौकशी करण्याची मागणी

बदनापूर तालुक्यातील सागरवाडी येथे कचरूसिंग या शेतकऱ्याती तीन एकर शेतजमीन आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे सततची नापिकी आणि शेती पिकांच्या उत्पादनात होणाऱ्या प्रचंड घटीमुळे हा शेतकरी संकटात होता. त्याने महाराष्ट्र बँकेच्या गेवराई बाजार शाखेतून आणि महिंद्रा फायनान्सकडून जवळपास अडीच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. यंदाही खरीप हंगामात अत्यल्प उत्पादन झाल्यामुळे हे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत हा शेतकरी होता. त्यातच मुलीचे लग्नाचे वय झाल्याने लग्न कसे करावे या चिंतेत या शेतकऱ्याने आपल्याच शेतात विषारी औषध सेवन केले.

हेही वाचा - पैठणजवळ जलवाहिनी फुटल्याने जालन्याच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम

ग्रामस्थांना हा प्रकार समजताच त्यांनी कचरूसिंगला औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू रविवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, सागरवाडी येथील विशाल जारवाल यांना ही माहिती समजताच त्यांनी पोलीस प्रशासन व तहसील प्रशासनाला शेतकऱ्याच्या आत्महत्येबददल माहिती दिली. कचरूसिंग या तरुण शेतकऱ्याच्या आत्म्हत्येची बातमी समजताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

Intro:बदनापूर, दि. 19 (प्रतिनिधी): नापिकी व कर्ज कसे फेडावे या चिंतेने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे आत्महत्येचे सत्र सुरूच असून बदनापूर तालुक्यातील सागरवाडी येथील एका 38 वर्षीय तरुण शेतकऱ्यांच्या आज घडलेल्या आत्महत्येच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बदनापूर तालुक्यातील सागरवाडी येथील तरुण शेतकरी कचरूसिंग दिवाणसिंग जारवाल हा 38 वर्षीय शेतकऱ्याकडे सागरवाडी शिवारात गट क्रमांक 311 मध्ये एकूण तीन एकर शेतजमीन आहे. मागील चार ते पाच वर्षापासून तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेती पिकांच्या उत्पादनात होणारी प्रचंड घटीमुळे हा शेतकरी हवालदिल होता. त्यामुळे त्याने शेती करण्यासाठी शेतीत लागवडीसाठी महाराष्ट्र बँक शाखा गेवराई बाजार येथील व महेंद्रा फायनान्स या संस्थेकडून जवळपास अडीच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. यंदाही खरीप हंगामात अत्यल्प उत्पादन आल्यामुळे हे कर्ज कसे फेडावे या विवंचनेने व मुलगी लग्नाला आल्यामुळे आता लग्न कसे करावे या चिंतेत या शेतकत्याने शनिवारी सायंकाळी 5 वाजता गट क्रमांक 311 मध्ये असलेल्या शेतीतच विषारी औषध सेवन केले. ग्रामस्थांना हा प्रकार समजताच त्यांनी जारवाल याला शासकीय रुग्णालय, औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल केले होते. परंतु रविवारी पहाटे 5 वाजेच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान सागरवाडी येथील विशाल जारवाल यांना ही माहिती समजताच त्यांनी पोलिस प्रशासन व तहसील प्रशासनाला या शेतकऱ्यांच्या आत्महत्येबददल माहिती दिली. कचरू जारवाल या तरुण शेतकऱ्याच्या आत्म्हत्येची वार्ता समजताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.Body:फोटोConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.