जालना - जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा छळले आहे. या पावसामुळे जिल्ह्यात कापूस, ज्वारी, सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे पुन्हा शेतकऱ्याची दिवाळी अधारातच जाणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
हेही वाचा - तृतीयपंथीयांच्या विविध मागण्यांसाठी बजावला मतदानाचा हक्क - सानिया ठाकरे
जिल्ह्यात काही ठिकाणी नुकतीच ज्वारीची, सोयाबीनची पेरणी करण्यात आली. अशातच परतीच्या पावसाने झोडपल्यामुळे सोयाबीन, ज्वारीची पिके सडून गेली आहेत. एकीकडे शेतात कामासाठी मजूर मिळत नाहीत तर दुसरीकडे पाऊसही शेतकऱ्याला छळत आहे. याच सोयाबीन च्या पिकांपर बळीराजाची दिवाळी साजरा होणार होती. त्यात कुटुंबातील सर्वांना कपडे, फराळ याप्रकारे दिवाळी साजरा होणार होती. मात्र, या परिस्थितीमुळे बळीराजाची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
हेही वाचा - पीएमसी बँक घोटाळा : वाधवान पिता-पुत्राला न्यायालयीन कोठडी
संबंधित शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्याकडे आपली व्यथा मांडली असता शेतात येऊन पंचनामे करण्यात येतील. आणि त्यानंतरच नुकसान भरपाई मिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - भिवंडीत अग्नितांडव : टिव्ही संच साठवलेल्या गोदामांना भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान
तर दुसरीकडे एकीकडे हे चित्र असतानाच बदनापूर तालुक्याची जीवन दहिनी असलेला सोमठाणा येथील निम्न दुधना प्रकल्प संपूर्ण पावसाळ्यात कोरडाठाक होता. रविवारपर्यंत या प्रकल्पात एक थेंब पाणी नव्हते. मात्र, परतीच्या पावसाने शनिवार पासून लावलेल्या हजेरीमुळे धरणात जोरदार पाणी साठा झाला आहे. यामुळे बदनापूर शहरासह जवळपास 40 गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. तसेच शेतकऱ्यांनाही रब्बीच्या आशा वाढल्या आहेत. या पाण्यामुळे गहू व हरभरा पिकाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.