ETV Bharat / state

चंद्रपूर : गणपती विसर्जनावेळी 5 जण नदीत वाहून गेले, एकाचा मृत्यू

author img

By

Published : Sep 21, 2021, 11:48 AM IST

Chandrapur
Chandrapur

चंद्रपुरात गणपती विसर्जनावेळी ईरई नदीत 5 जण वाहून गेल्याची घटना घडली. 5 पैकी एकाचा वाहून गेल्याने मृत्यू झाला. त्याचा आज मृतदेह सापडला आहे. तर चौघांना वाचवण्यात यश आले आहे.

चंद्रपूर : नेताजी सुभाषचंद्र बोस गणेश मंडळाच्या गणपतीच्या विसर्जनावेळी एक दुर्घटना घडली. बोकारे प्लाट रामनगरचे पाच जण रात्री गणपती विसर्जनावेळी ईरई नदीत वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे.

चौघांना वाचवण्यात यश

ही घटना काल (20 सप्टेंबर) रात्रीच्या सुमारास दाताळा मार्गावर घडली. नदीच्या पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने पाच जण यात वाहून गेले. यात चार जणांना मोठ्या जिकरीने वाचविण्यात आले. मात्र एक जण यात वाहून गेला.

प्रवीण उर्फ गोलू वनकर असे या युवकाचे नाव आहे. कालपासून शोधकार्य सुरू होते. आज त्याचा मृतदेह आढळून आला.

हेही वाचा - वर्सोवा समुद्रात बुडालेल्या ५ पैकी 3 मुलांचा मृत्यू

हेही वाचा - वर्सोव्यात पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला जीव, पाहा व्हिडिओ...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.