ETV Bharat / state

हरवलेल्या लोकांना शोधून काढण्यात पोलीस एक नंबर!

author img

By

Published : Dec 28, 2019, 10:49 PM IST

विशेष मोहीम
विशेष मोहीम

2019 मध्ये एकूण 642 लोक हरवल्याच्या तक्रारी होत्या. नोव्हेंबर महिन्यापर्यंत 642 पैकी 617 लोकांना शोधून काढण्यात भंडारा पोलिसांना यश मिळाले.

भंडारा - जिल्ह्याच्या पोलीस विभागाने हरवलेल्या लोकांना शोधून काढण्यासाठी विशेष मोहीम राबवली. या माध्यमातून मागच्या सहा महिन्यात हरवलेल्या लोकांपैकी 99 टक्के लोकांना शोधून काढण्यात भंडारा पोलीस विभागाला यश आले आहे. हरवलेल्या लोकांमध्ये सर्वांत जास्त संख्या अल्पवयीन मुलींची आहे.

भंडारा पोलिसांचे यश


घरातून पळून जाण्याच्या प्रमाणामुळे या हरवलेल्या लोकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येत्या काळात या अल्पवयीन मुला-मुलींच्या जनजागृतीसाठी शाळेत आणि गावांमध्ये पोलीस विभागाच्यावतीने विशेष मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक अनिकेत भारती यांनी दिली.

भंडारा जिल्ह्यात मागील 5 वर्षात घरातून पळून जाणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलींचे प्रमाण वाढले आहे. या मध्ये 14 ते 17 वयोगटातील मुलींचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. दरवर्षी हे प्रमाण वाढत असल्याने पालक आणि पोलिसांसाठी हा चिंतेचा विषय बनला होता. त्यामुळे या विषयाला पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने घेऊन विशेष मोहीम राबवली होती. त्याचा सकारात्मक निकालही पुढे आला आहे.

हेही वाचा - नव्या वर्षात कांद्यासह बटाट्याच्या किमती कमी होण्याची शक्यता

जिल्ह्यात 2018 मध्ये 742 स्त्री-पुरुष हरवल्याची तक्रार भंडारा जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाल्या होत्या. यात 220 पुरुष आणि 486 स्त्रियांचा समावेश होता. या पैकी 533 लोकांना पोलिसांनी शोधून काढले आहे. 2019 मध्ये एकूण 642 लोक हरवल्याच्या तक्रारी होत्या. नोव्हेंबर महिन्यापर्यंत 642 पैकी 617 लोकांना शोधून काढण्यात भंडारा पोलिसांना यश मिळाले.

Intro:Anc : - भंडारा जिल्ह्याच्या पोलीस विभागाने मानवीय दृष्टिकोनातून विचार करतात हरवलेल्या लोकांना शोधून काढण्यासाठी विशेष मोहीम राबविली आहे आणि त्याची फलश्रुती म्हणून मागच्या सहा महिन्यात हरवलेल्या लोकांपैकी 99 टक्के लोकांना शोधून काढण्यात पोलीस विभागाला यश मिळालेला आहे. या हरवलेल्या लोकांपैकी सर्वात जास्त अल्पवयीन मुलींची संख्या आहे. घरून पळून जाण्याच्या प्रमाणामुळे या हरवलेल्या लोकांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे येत्या काळात या अल्पवयीन मुला-मुलींच्या जनजागृतीसाठी शाळेत आणि गावांमध्ये विशेष मोहीम राबविली जाणार आहे.Body:भंडारा जिल्ह्यत तीन तालुक्यामध्ये मागील 5 वर्षात घरून पळून जाणाऱ्या अल्पवयीन मुलामुलींचे प्रमाण वाढले आहे या मध्ये 14 ते 17 वयोगटातील मुलीने प्रमाण सर्वात ज्यात आहे आणि दर वर्षी हे प्रमाण वाढत असल्याने पालक आणि पोलिसांसाठी हा चिंतेचा विषय बनला होता त्यामुळे या विषयाला पोलीस अधीक्षक यांनी गांभीर्याने घेत दर शनिवारी याचा आढावा घेण्याची सूचना केली आहे आणि त्याचा सकारात्म निकालही पुढे आले आहे.
जिल्ह्यात 2018 मध्ये 742 स्त्री- पुरुष हरवल्याची तक्रार भंडारा जिल्ह्याच्या विविध पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली गेली यामध्ये 220 पुरुष तर 486 स्त्रिया होत्या या पैकी 533 लोकांना पोलिसांनी शोधून काढले तर 2019 मध्ये एकूण 642 लोक हरवले होते म्हणजेच मागच्या वर्षीच्या तुलनेत 36 लोक अधिक हरविल्याची तक्रार दाखल झाली होती यामध्ये 240 पुरुष स्थळ 429 स्त्रिया होत्या म्हणजेच प्रत्येक वर्षी स्त्रियांची संख्या जास्त असते यावर्षी नोव्हेंबर पर्यंत 742 पैकी 617 लोकांना शोधून काढण्यात भंडारा पोलिसांना यश मिळाले आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत आठ टक्के जास्त लोक भंडारा पोलिसांनी शोधून काढले आहे यातही मागील सहा महिन्यात हरविलेल्या 327 पैकी 323 म्हणजे 99 टक्के लोकांना शोधून काढण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
या हरविलेल्या स्त्री- पुरुषांमध्ये लहान मुले व वृद्ध तरुण-तरुणी हे लोकही असतात मात्र जवळपास ऐंशी टक्के 14 ते 17 वयोगटातील अल्बम नवीन मुलं मुली असतात त्यामुळेच या विषयाला गांभीर्याने घेत भंडारा पोलीस स्टेशनमध्ये मागील तीन महिन्यापासून या हरवलेल्या लोकांना शोधून काढण्याचे प्रयत्न इतर मोठ्या पुण्याप्रमाणे प्राथमिकता देऊन केले जात आहे दर शनिवारी संपूर्ण जिल्ह्यातून प्रत्येक पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कोणती व्यक्ती केव्हा हरविली आणि केव्हा त्याचा शोध लागला याविषयीची सविस्तर माहिती पोलिस अधीक्षक यांना दिली जाते चांगले काम त्या पोलिस कर्मचारी अधिकाऱ्यांना लगेच वरिष्ठांकडून कौतुक केले जाते आणि पुढे त्यांना प्रोत्साहनपर पुरस्कारही दिले जाणार आहे अधिकाऱ्यांकडून दखल घेतली गेली जात असल्यामुळे सर्व कर्मचारी आणि अधिकारी कामाला लागले आहेत आणि त्याची फलश्रुती म्हणून मागील सहा महिन्यात हरविलेल्या लोकांपैकी 92 टक्के लोकांना शोधण्यात भंडारा जिल्हा पोलीस यांना यश मिळाले आहे.
येणाऱ्या काळात या अल्पवयीन मुला- मुलींशी संवाद साधून त्यांची जनजागृती करण्यासाठी शाळा आणि गावात पोलिसांतर्फे विशेष अभियान राबविले जाणार आहे यामुळे घरून पळून जाणाऱ्या अल्पवयीन मुला मुलीची संख्या कमी होईल अशी आशा पोलीस विभागातर्फे केली जात आहे.
बाईट : अनिकेत भारती, जिल्हा पोलीस उप अधीक्षक, भंडाराConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.