ETV Bharat / state

अप्पर वर्धा धरणाच्या कालव्यात तरुण गेला वाहून; मुख्य पुलावरून तोल गेल्याने घडली दुर्घटना

author img

By

Published : Jan 8, 2020, 7:22 PM IST

canal
बेपत्ता शक्ती चंदर भोसले

शक्ती चंदर भोसले हा दुपारी कालव्याच्या पुलावर बसला होता. त्याचा तोल गेल्याने तो कालव्यात पडून वाहून गेला. या कालव्यात शेती सिंचनासाठी पाणी सोडले जाते. वाहून गेलेला तरुण अद्यापही बोपत्ता आहे. त्याचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

अमरावती - जिल्ह्यातील तिवसा येथे अप्पर वर्धा धरणाच्या मुख्य कालव्यात एक तरूण वाहून गेल्याची घटना आज (8 जानेवारी) दुपारच्या सुमारास घडली. पुलावर बसलेल्या तरुणाचा तोल गेल्याने तो पुलावरून थेट मुख्य कालव्यात पडला. शक्ती चंदर भोसले (वय 31), वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे.

हेही वाचा - नदीपात्र ओलांडताना आजोबांसह तीन नाती गेल्या वाहून; एक मुलगी बेपत्ता

शक्ती चंदर भोसले हा दुपारी कालव्याच्या पुलावर बसला होता. त्याचा तोल गेल्याने तो कालव्यात पडून वाहून गेला. या कालव्यात शेती सिंचनासाठी पाणी सोडले जाते. वाहून गेलेला तरुण अद्यापही बोपत्ता आहे. त्याचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

Intro:अप्पर वर्धा धरणाच्या मुख्य कालव्यावरील
पुलावरून तोल गेल्याने तरुण गेला वाहून.

अमरावती अँकर
अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे आज दुपारी अप्पर वर्धा धरणाच्या मुख्य कालव्याच्या पुलावर बसलेल्या एका 31 वर्षीय तरुणाचा तोल गेल्याने तो पुलावरून थेट अप्पर वर्धाच्या मुख्य कालव्यात पडला शक्ती चंदर भोसले रा.तिवसा असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव असून तो दुपारी कालव्याच्या पुलावर बसला होता मात्र त्याचा तोल गेला व थेट कालव्यात पडून वाहून गेला या कालव्याला शेती सिंचनासाठी पाणी सोडले जाते वाहून गेलेल्या तरुणाचा शोध लागला नसून शोध व बचाव पथकाला पाचारण करण्यात आले असून सध्या या तरुणाचा शोध घेतल्या जात आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.