ETV Bharat / state

'राज्य सरकारचा ५ वर्षातला कारभार म्हणजे फटा पोस्टर निकला झिरो'

author img

By

Published : Oct 16, 2019, 11:39 AM IST

गेल्या ५ वर्षातला राज्य सरकारचा कारभार म्हणजे फटा पोस्टर निकला झिरो असा असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले.

अजित पवार

अहमदनगर - गेल्या ५ वर्षातला राज्य सरकारचा कारभार म्हणजे फटा पोस्टर निकला झिरो असा असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले. मुख्यमंत्री मी पुन्हा येणार असे सांगत आहेत. पण कशासाठी? राज्याला कर्जबाजारी करण्यासाठी, बेरोजगारी वाढवण्यासाठी, संसार रस्त्यावर आणण्यासाठी की शेतकरी आत्महत्या वाढवण्यासाठी असे सवाल अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केले.

  • ५ वर्षांतला यांचा कारभार म्हणजे फटा पोस्टर निकला झिरो, असं म्हणायची वेळ आलीय. तरी 'मी पुन्हा येणार' असं CM सांगतात. कशासाठी? राज्याला कर्जबाजारी करण्यासाठी, बेरोजगारी वाढवण्यासाठी, संसार रस्त्यावर आणण्यासाठी, शेतकरी आत्महत्या वाढवण्यासाठी,साखर-कांदा आयात करण्यासाठी पुन्हा यायचंय? pic.twitter.com/XkgZkJdQDt

    — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - विधानसभा २०१९ : आज अकोला, परतूर, पनवेलमध्ये पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभा

हेही वाचा - मोदी हे आंतरराष्ट्रीय पंतप्रधान; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

कर्जत-जामखेड मतदारसंघाचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ राशीनमध्ये आयोजीत प्रचारसभेत पवार बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. शिक्षण संस्थांचे जाळे उभारल्याने बारामतीचा शैक्षणिकदृष्ट्या विकास झाला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातही चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील असेही अजित पवार म्हणाले. या मतदारसंघात रोहित पवार चांगल्या पद्धतीने प्रतिनिधित्व करतील, असा मला विश्वास आहे. कोणाला कमीपणा वाटेल, असे काही घडणार नाही. तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही. मिळालेल्या सत्तेचा वापर सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी करायचा असतो, असेही पवार म्हणाले.

Intro:Body:

सरकारचा ५ वर्षातला कारभार म्हणजे फटा पोस्टर निकला झिरो - अजित पवार

 



अहमदनगर -  गेल्या ५ वर्षातला राज्य सरकारचा कारभार म्हणजे फटा पोस्टर निकला झिरो असा असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले. मुख्यमंत्री मी पुन्हा येणार असे म्हणत आहेत.  कशासाठी? राज्याला कर्जबाजारी करण्यासाठी, बेरोजगारी वाढवण्यासाठी, संसार रस्त्यावर आणण्यासाठी की शेतकरी आत्महत्या वाढवण्यासाठी असे सवाल अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केले.



शिक्षण संस्थांचे जाळं उभारल्यानं बारामतीचा शैक्षणिकदृष्ट्या विकास झाला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातही चांगल्या दर्जाचं शिक्षण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील असेही अजित पवार म्हणाले. या मतदारसंघात रोहित पवार चांगल्या पद्धतीनं प्रतिनिधित्व करतील, असा मला विश्वास आहे. कोणाला कमीपणा वाटेल, असे काही घडणार नाही. तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही. मिळालेल्या सत्तेचा वापर सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी करायचा असतो, असेही पवार म्हणाले. 





 


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.