ETV Bharat / sports

Kapil Dev Statement : अश्विन कसोटीतून बाहेर होऊ शकतो, तर कोहलीलाही टी-20 संघातून वगळले जाऊ शकते - कपिल देव

author img

By

Published : Jul 9, 2022, 3:58 PM IST

Kapil Dev
कपिल देव

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Former captain Virat Kohli ) जवळपास तीन वर्षांपासून मोठी खेळी खेळण्यासाठी संघर्ष करत आहे. या प्रकरणावर माजी खेळाडू कपिल देव यांचे मत आहे की, जर रविचंद्रन अश्विनसारख्या प्रतिभावान गोलंदाजाला कसोटी संघातून वगळले जाऊ शकते, तर विराट कोहलीलाही टी-20 संघातून बाहेर केले जाऊ शकते.

नवी दिल्ली : रविचंद्रन अश्विनसारख्या प्रतिभावान गोलंदाजाला कसोटी संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते, तर दीर्घकाळ आपल्या लयीसाठी झगडत असलेल्या विराट कोहलीलाही टी-20 संघातून बाहेर करावे, असे मत भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त ( Kapil Dev Statement on Virat Kohli ) केले. कोहलीला बाहेर करणे ही मोठी समस्या नसावी. कारण कोहली जवळपास तीन वर्षांपासून मोठी खेळी खेळण्यासाठी झगडत आहे. कपिल देव म्हणाले लयीत असलेल्या खेळाडूंना कौशल्य दाखवण्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने पुरेशी संधी न दिल्यास त्यांच्यावर अन्याय होईल.

कपिल म्हणाले, जर तुम्ही कसोटीतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम गोलंदाज असलेल्या अश्विनला ( Spinner Ravichandran Ashwin ) संघाबाहेर ठेवू शकता, तर जगातील अव्वल क्रमांकाचा खेळाडूही बाहेर बसू शकतो. कपिल म्हणाले, कोहलीने धावा कराव्यात अशी माझी इच्छा आहे, पण सध्या विराट कोहली आपण ज्या विराटला ओळखतो त्यानुसार खेळत नाही. त्याने आपल्या कामगिरीच्या जोरावर आपले नाव केले आहे, पण जर त्याला कामगिरी करता येत नाही तर आपण नवीन खेळाडूंना बाहेर ठेवू शकत नाही.

भारतीय संघाचा माजी कर्णधार ( Former Indian captain Kapil Dev ) म्हणाले की, संघात स्थान मिळवण्यासाठी कोहली आणि युवा खेळाडूंमध्ये चांगली स्पर्धा व्हावी, अशी माझी इच्छा आहे. ते म्हणाले, नवीन खेळाडूंनी विराटप्रमाणे कामगिरी करावी अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे विराटने अशा प्रकारे पुनरागमन करावे की नवीन खेळाडूंना त्यांचा स्तर आणखी उंचवावा लागेल. दोघांमध्ये चांगली स्पर्धा असावी असे मला वाटते. विराटने असा विचार करायला हवा की तो एकेकाळी संघाचा अव्वल फलंदाज होता आणि त्याला या संघातही तेच करायचे आहे. संघासाठी ही चांगली समस्या आहे.

कपिल म्हणाले की, वेस्ट इंडिज दौऱ्यातील विराटची 'विश्रांती' त्याच्यासाठी संघाबाहेर आहे. ते म्हणाले, तुमची इच्छा असेल तर तुम्ही याला विश्रांती म्हणू शकता किंवा संघातून बाहेर केले बोलू शकता. यावर प्रत्येकाचे स्वतःचे मत असू शकते. निवडकर्त्यांनी त्याची निवड केली नसेल, तर मोठे खेळाडू कामगिरी करत नसल्यामुळे असे होऊ शकते. कपिल म्हणाला की, प्लेइंग इलेव्हनची निवड सध्याच्या फॉर्मच्या आधारावर केली पाहिजे, मागील कामगिरीच्या आधारावर नाही.

कपिल देव म्हणाले, जेव्हा तुमच्याकडे भरपूर पर्याय असतील, तेव्हा तालमीत जाणाऱ्या खेळाडूंना संधी द्या. केवळ प्रतिष्ठेच्या जोरावर तुम्ही जाऊ शकत नाही. तुम्हाला विद्यमान फॉर्मच्या आधारे निवड करावी लागेल. तुम्ही प्रस्थापित खेळाडू असाल पण याचा अर्थ असा नाही की सलग पाच सामन्यांमध्ये खराब कामगिरी करूनही तुम्हाला संधी दिली जाईल.

हेही वाचा - IND vs ENG 2nd T20 : भारत आणि इंग्लंड संघातील आज दुसरा सामना, भारताला मालिका जिंकण्याची संधी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.