ETV Bharat / city

Independence Day ध्वजारोहणाची जबाबदारी मंत्री, जिल्हाधिकाऱ्यांवर

author img

By

Published : Aug 11, 2022, 8:30 PM IST

Independence Day
Independence Day

येत्या १५ ऑगस्टला ध्वजारोहणाची ( 15th August Independence Day ) जबाबदारी यामुळे केवळ १८ नवनिर्वाचित मंत्र्यांवर असणार आहे. उर्वरित ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना ध्वजारोहण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे ( Chief Minister Shinde ) यांनी प्रत्येक जिल्ह्यातील ध्वजारोहणाची जबाबदारी मंत्री, जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवली आहे. यंदा देशाचा अमृत महोत्सवी वर्ष ( Azadi Ka Amrit Mahotsav ) साजरा केला जातो आहे. देशासह राज्यात हर घर तिरंगा हा ( Har Ghar Tricolor Campaign ) उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

मुंबई - येत्या १५ ऑगस्टला ( 15th August Independence Day ) देशाचा अमृतमहोत्सवी वर्षे साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे ( Chief Minister Shinde ) यांनी प्रत्येक जिल्ह्यातील ध्वजारोहणाची जबाबदारी मंत्री, जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवली आहे. यासंदर्भातील यादी राज्य सरकारने जाहीर केली आहे. यंदा देशाचा अमृत महोत्सवी वर्ष ( Azadi Ka Amrit Mahotsav ) साजरा केला जातो आहे. देशासह राज्यात हर घर तिरंगा हा ( Har Ghar Tricolor Campaign ) उपक्रम हाती घेण्यात आला आहे. घरघरात तिरंगा पोहवण्याची जबाबदारी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थावर सोपवली आहे.

अवघ्या तीन दिवसांवर स्वतंत्र दिन येऊन ठेपल्याने धावपळ वाढली आहे. राज्य सरकारचा नुकताच मंत्रिमंडळ विस्तार झाला. मंत्रिमंडळात ४२ मंत्री असतात. मात्र, १८ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्यात अद्याप पालकमंत्री नेमलेले नाहीत. येत्या १५ ऑगस्टला ध्वजारोहणाची जबाबदारी यामुळे केवळ १८ नवनिर्वाचित मंत्र्यांवर असणार आहे. उर्वरित ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना ध्वजारोहण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकूण ३५ जिल्ह्यात ध्वजारोहण केले जाणार आहे. त्यामुळे मंत्री नसलेल्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी ध्वजारोहण कारणार आहेत. राज्य सरकारने यासंदर्भातील यादी जाहीर केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.