ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत शुक्रवारी 402 कोरोना रुग्णांची नोंद; 3 जणांचा मृत्यू

author img

By

Published : Sep 2, 2022, 7:01 PM IST

Mumbai Corona Update
Mumbai Corona Update

मुंबईत दररोज ८०० ते १२०० दरम्यान रोज रुग्णसंख्या Mumbai Corona Update नोंद होत होती. आज चाचण्या कमी झाल्याने केवळ 402 रुग्णांची नोंद झाली 402 Corona patients Mumbai 01 September आहे. मुंबईत आज 3 मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या 3414 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

मुंबई - मुंबईत रोज ८ ते १३ हजार दरम्यान चाचण्या केल्या जातात. यामुळे ८०० ते १२०० दरम्यान रोज रुग्णसंख्या Mumbai Corona Update नोंद होत होती. आज चाचण्या कमी झाल्याने केवळ 402 रुग्णांची नोंद झाली 402 Corona patients Mumbai 01 September आहे. मुंबईत आज 3 मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या 3414 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

४०२ नवे रुग्ण : मुंबईत आज २ सप्टेंबरला ५८३४ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४०२ रुग्णांची नोंद झाली. आज ३ मृत्यूची नोंद झाली आहे. ८७६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ४५ हजार ४९७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख २२ हजार ३७८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ७०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३४१४ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १५३६ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०४६ टक्के इतका आहे.


रुग्णसंख्येत वाढ : मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १८ जुलैला १६७ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. २ ऑगस्टला ३२९, ३ ऑगस्टला ४३४, ४ ऑगस्टला ४१०, ५ ऑगस्टला ४४६, ६ ऑगस्टला ४८६, ७ ऑगस्टला ४६५, ८ ऑगस्टला ४०७, ९ ऑगस्टला ४७९, १० ऑगस्टला ८५२, ११ ऑगस्टला ६८३, १२ ऑगस्टला ८७१, १३ ऑगस्टला ८६७, १४ ऑगस्टला ८८२, १५ ऑगस्टला ५८४, १६ ऑगस्टला ३३२, १७ ऑगस्टला ९७५, १८ ऑगस्टला १२०१, १९ ऑगस्टला १०११, २० ऑगस्टला ८४०, २१ ऑगस्टला ८१८, २२ ऑगस्टला ५९२, २३ ऑगस्टला ८३२, २४ ऑगस्टला ७९३, २५ ऑगस्टला ८३८, २६ ऑगस्टला ६७९, २७ ऑगस्टला ६२५, २८ ऑगस्टला ६१०, २९ ऑगस्टला ३५१, ३० ऑगस्टला ५१६, ३१ ऑगस्टला ६३८, १ सप्टेंबरला २७२, २ सप्टेंबरला ४०२ रुग्णांची नोंद झाली आहे.



११९ वेळा शून्य मृत्यूची नोंद : मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ११९ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा, जुलै महिन्यात ६ वेळा तर ऑगस्ट महिन्यात ७ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा - NCW Written Letter Maharashtra DGP 'त्या' महिलेला मारहाण करणाऱ्याला तत्काळ अटक करा; महिला आयोगाचे महाराष्ट्र डीजीपींना पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.