ETV Bharat / city

Nana Patole On Nagar Panchayat Election : "...म्हणून स्वबळावर लढण्याचा निर्णय"

author img

By

Published : Jan 20, 2022, 6:13 AM IST

Nana Patole
Nana Patole

राज्यातील नगरपंचायत निवडणुकीचा ( Maharashtra Nagar Panchayat Election Result ) निकाल हाती आला आहे. त्यात काँग्रेसने चांगली मुसंडी मारली आहे. जनतेचे आर्शीवादामुळेच निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याचे नाना पटोले यांनी ( Nana Patole On Nagar Panchayat Election ) सांगितले.

मुंबई - राज्यातील नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने चांगली ( Congress Nagar Panchayat Election ) मुसंडी मारली आहे. याचे सर्व श्रेय महाराष्ट्रातील जनतेचे आहे. त्यांच्या आर्शीवादामुळेच निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आणि हा निकाल लागला, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ( Nana Patole On Nagar Panchayat Election ) दिली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

पक्ष विस्तारासाठी वेगळ लढावे लागते

"महाराष्ट्रात विदर्भात काँग्रेस पुढे आहे. पश्चिम महाराष्ट्रात आम्ही काही ठिकाणी पुढे आहोत. कोकणात आम्ही खाते उघडले आहे. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी काम केले आहे. भंडाऱ्याचा निकाल अजून मिळायचा आहे. अनेक ठिकाणी जागा वाटपात गोंधळ होऊ नये, यासाठी स्वबळावर आम्ही निवडणूक लढलो. जनतेने त्याला भरभरुन यश दिले. तसेच राज्यात जनतेने महाविकास आघाडीला ( Nana Patle On Mahavikas Aghadi ) पसंती दिली आहे. राज्यात काँग्रेस वेगळी लढल्याने जागा घटल्याचे बोलले जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला असता मला राष्ट्रवादी किंवा कोणावर आरोप करायचा नाही. आम्ही अनेक भागात वाढलो आहोत. पक्ष विस्तारासाठी वेगळ लढावे लागते," असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

पट्टी डोळ्याला बांधून भाजपा बोलत आहे

राज्यात भाजप मोठा पक्ष असल्याचा दावा, भाजप नेते चंद्रकांत पाटील ( Mla Chandrakant Patil ) यांनी केला आहे. यावर पटोले यांनी पाटील यांची फिरकी घेतली. ते बरोबर बोलतात. त्यांचा पक्ष सर्वात मोठा आहे. देश विकायला भाजप मोठा पक्ष आहे. पट्टी डोळ्याला बांधून भाजप बोलत असल्याचा टोला पटोले यांनी पाटील यांना ( Nana Patole On Chandrakant Patil ) लगावला. गोवा विधानसभा निवडणुकीबाबत पटोले यांनी म्हटलं की, गोव्यात काँग्रेसची ताकद ( Nana Patol On Goa Election ) आहे. तेथे आमचीच सत्ता येईल. बहुमताचे सरकार काँग्रेसचे बनत असेल तर आघाडी का करु? प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करायचा अधिकार आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक या विधानसभा, लोकसभा निवडणुका पेक्षा वेगळ्या असल्याचे पटोले यांनी सांगितले.

हेही वाचा - Nagar Panchayat Election 2022 : 'आर्थिक बळावर जागा जिंकल्या...'; दीपक केसरकरांचा भाजपावर घणाघात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.