ETV Bharat / city

Congress Balasaheb Thorat Critisize राज्य सरकार गुजरातचे मन सांभाळत आहे, बाळासाहेब थोरातांचा शिंदे सरकारवर निशाणा

author img

By

Published : Sep 14, 2022, 3:52 PM IST

Congress Balasaheb Thorat
Congress Balasaheb Thorat

Congress Balasaheb Thorat Critisize दांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर चहुबाजूनी विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची जोड उठवली आहे. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही शिंदे सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल Congress Balasaheb Thorat Critisize केला आहे. स्पर्धेत नसलेल्या गुजरातला हा प्रकल्प देऊन राज्य सरकार Eknath Shinde Govt गुजरात सरकारचं मन सांभाळत आहे.

मुंबई वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर चहुबाजूनी विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची जोड उठवली आहे. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही शिंदे सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल Congress Balasaheb Thorat Critisize केला आहे. स्पर्धेत नसलेल्या गुजरातला हा प्रकल्प देऊन राज्य सरकार Eknath Shinde Govt गुजरात सरकारचं मन सांभाळत आहे. मात्र महाराष्ट्रातील तरुणांचे यामुळे मोठे नुकसान होणार आहे, असा घणाघात बाळासाहेब थोरात Congress leader Balasaheb Thorat यांनी केला आहे.

बाळासाहेब थोरातांचा शिंदे सरकारवर निशाणा

कंपनीला कोणताही प्रतिसाद नव्हता महाविकास आघाडी सरकारमुळे वेदांत सारखा प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. या आरोपाचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी खंडन केले. वेदांता सारखा प्रकल्प जाणे, Vedanta Project Gone Gujarat अत्यंत दुर्दैवी गोष्ट महाराष्ट्रासाठी आहे. महाविकास आघाडीमुळे प्रकल्प गेला, असा आरोप करणाऱ्यांनी मागील तीन महिन्यात कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. शिवाय, महाराष्ट्रात प्रकल्प यावा, याकरिता संबंधित उद्योग कंपनीला कोणताही प्रतिसाद दिला नव्हता. तसेच या स्पर्धेमध्ये तीन राज्य होती. यामध्ये गुजरात राज्य नव्हते आणि अशावेळी गुजरातला प्रकल्प जाणे, हे गुजराती सरकारचे मन सांभाळण्यासाठी आपले राज्य सरकार काम करत आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात Congress leader Balasaheb Thorat यांनी केली आहे.

मविआ सरकारचा पाठपुरावा गुजरात सरकारच्या प्रेमापोटी महाराष्ट्रातील युवकांचे प्रचंड नुकसान राज्य सरकारने केले आहे. रोजगाराची संधी सरकारने हिसकावून घेतली असून पोटापाण्यासाठी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काय करायचं, प्रश्न उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातील मुलांनी केवळ दहीहंडी फोडायचे एवढेच काम करायचे का ? असा सवाल विचारला आहे. तसेच मविआच्या सरकार वेळी उद्योग मंत्री, मुख्यमंत्र्यांनी चांगले काम केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः जातीने लक्ष घातले होते. मात्र, आताच्या मुख्यमंत्र्यांना दोन महिन्यांत वेळ मिळाला नाही. ते सत्कार समारंभात मग्न असून पन्नास हजारांचे हार घालून फिरत आहेत. महत्त्वाच्या गोष्टींकडे सरकारचे लक्ष नाही. पालकमंत्री ही अद्याप नेमलेले नाहीत, Congress leader Balasaheb Thorat असा टोला थोरात यांनी लगावला आहे.

सोयीस्कर दुर्लक्ष पालघरच्या साधूंच्या मारहाणीनंतर तत्कालीन सरकार हिंदूविरोधी असल्याचा आरोप भाजपने केला होता. आता साधूना मारहाण झाली मग हे सरकार काय करत आहे. एकीकडे हिंदू असल्याचे मिरवायचे, पाट्या लावायच्या आणि दुसरीकडे अशा प्रकरणाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करायचे, असे थोरात म्हणाले. या सरकारचा कायदा आणि सुव्यवस्था, कोणत्याही गोष्टीकडे लक्ष नाही, अशी टीका केली आहे. गोवा राज्यातील मिशन लोटस बाबत माहिती नसल्याचे सांगत अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.