ETV Bharat / city

बापरे ! राज्यात दररोज होतंय 30 मुलांचं अपहरण

author img

By

Published : Jan 16, 2020, 7:52 AM IST

Kidnapping of children
लहान मुलांचे् अपहरण

राज्यात अपहरण होणाऱ्या मुलांच्या घटनांवर 'क्राय' या संस्थेने चिंचा व्यक्त केली आहे. संस्थेच्या अहवालाप्रमाणे दररोज सुमारे तीस मुलांचे अपहरण होते.

मुंबई - राज्यात दररोज 30 मुलांचे अपहरण होत असते. या अपहरण होणाऱ्या मुलांमध्ये तब्बल 72 टक्के मुलींचा समावेश असून या विषयी 'चिल्ड्रन राइट्स अँड यू' (क्राय) या संस्थेने चिंता व्यक्त केली. यासाठी सरकारने आणि राज्य तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी संस्थेकडून करण्यात आली आहे.

'क्राय' संस्थेचे प्रतिनिधी सिध्दार्थ उघाडे यांची प्रतिक्रिया....

हेही वाचा... शिवाजी महाराज यांची मोदींशी तुलना करणे चुकीचे - विक्रम गोखले

एनसीआरबीने आपला 2018 चा राष्ट्रीय स्तरावरील गुन्हेगारीचा एक अहवाल (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) नुकताच प्रसिद्ध केला. त्या अहवालाचे विश्लेषण 'क्राय' या संस्थेने करत महाराष्ट्रात दररोज तीस मुलांच्या अपहरण होत असल्याचे म्हटले. त्यामध्ये 72 टक्के मुलींचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आणली आहे.

हेही वाचा... पत्नी मकरसंक्रांतीची तयारी करत होती अन् जवानाच्या वीरमरणाची बातमी आली

देशभरात होणाऱ्या मुलांच्या अपहरण आणि इतर गुन्ह्यामध्ये ही महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. घटनांचे सर्वाधिक प्रमाण असलेले हे उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली आणि बिहार सोबतच महाराष्ट्र या पाच राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये 2018 मध्ये 10 हजार 117 प्रकरणे ही केवळ अपहरण सारख्या घटना घडल्या. तर त्यात 2017 च्या तुलनेत 15.6 टक्क्यांनी वाढ झाली असल्याने सरासरी राज्यात 30 मुलांचे अपहरण केले जाते, असा निष्कर्ष 'क्राय' संस्थेने आपल्या विश्लेषणात काढला आहे. त्यासोबतच मुलांच्या खुनाच्या बाबतीत ही देशभरात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असून 2017 या वर्षाच्या तुलनेत 2018 मध्ये 23 टक्क्यांची वाढ झाली. ती राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप जास्त असल्याचा दावा 'क्राय' चे प्रतिनिधी सिध्दार्थ उघाडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केला.

राज्यात लहान मुलांच्या अपहरणाच्या होणाऱ्या गुन्हा संदर्भात राज्य सरकारने त्यांची तातडीने नोंद घेऊन त्यावर कारवाई केली पाहिजे. यासोबतच असे गुन्हे होणार नाहीत, त्यावर आळा बसेल यासाठी सरकारने आर्थिक तरतूद करून त्यावर अंकुश आणला पाहिजे, अशी मागणीही 'क्राय' कडून करण्यात आली.

Intro:राज्यात अपहरण होणाऱ्या मुलांच्या घटनांवर 'क्राय' ने व्यक्त केली चिंता ,दररोज तीस मुलांचे होते अपहरण


mh-mum-01-child-cry-sidhharthughade-byte-7201153

(यासाठी काही फाईल फु टे ज वापरावेत)


मुंबई, ता.

राज्यात दररोज 30 मुलांचे अपहरण होत असते. या अपहरण होणाऱ्या मुलांमध्ये तब्बल 72 टक्के मुलींचा समावेश असून या विषयी चिल्ड्रन राइट्स अंड यू (क्राय) या संस्थेने चिंता व्यक्त करत यासाठी सरकारने आणि राज्य तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.

एनसीआरबीने आपला 2018 चा राष्ट्रीय स्तरावरील गुन्हेगारीचा एक अहवाल (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) नुकताच प्रसिद्ध केला असून त्या अहवालाचे विश्लेषण 'क्राय' या संस्थेने करत महाराष्ट्रात दररोज तीस मुलांच्या अपहरण होत असून त्यामध्ये 72 टक्के मुलींचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आणली आहे.

देशभरात होणाऱ्या मुलांच्या अपहरण आणि इतर पुण्यामध्ये ही महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे आपण घटनाचे सर्वाधिक प्रमाण असलेले हे उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली आणि बिहार सोबतच महाराष्ट्र या पाच राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये 2018 मध्ये 10 हजार 117 प्रकरणे ही केवळ अपहरण सारख्या घटना घडल्या. तर त्यात 2017 च्या तुलनेत 15.6 टक्क्यांनी वाढ झाली असल्याने सरासरी राज्यात 30 मुलांचे अपहरण केले जाते असा निष्कर्ष 'क्राय' संस्थेने आपल्या विश्लेषणात काढला आहे. त्यासोबतच मुलांच्या खुनाच्या बाबतीत ही देशभरात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असून 2017 या वर्षाच्या तुलनेत 2018 मध्ये 23 टक्‍क्‍यांची वाढ झाली असून ती राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप जास्त असल्याचा दावा 'क्राय' चे प्रतिनिधी सिध्दार्थ उघाडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केला.
राज्यात लहान मुलांच्या अपहरणाच्या होणाऱ्या गुन्हा संदर्भात राज्य सरकारने त्यांची तातडीने नोंद घेऊन त्यावर कारवाई केली पाहिजे, यासोबतच असे गुन्हे होणार नाहीत, त्यावर आळा बसेल यासाठी सरकारने आर्थिक तरतूद करून त्यावर अंकुश आणला पाहिजे, अशी मागणीही 'क्राय' कडून करण्यात आली.






Body:राज्यात अपहरण होणाऱ्या मुलांच्या घटनांवर 'क्राय' ने व्यक्त केली चिंता ,दररोज तीस मुलांचे होते अपहरण


mh-mum-01-child-cry-sidhharthughade-byte-7201153

(यासाठी काही फाईल फु टे ज वापरावेत)


मुंबई, ता.

राज्यात दररोज 30 मुलांचे अपहरण होत असते. या अपहरण होणाऱ्या मुलांमध्ये तब्बल 72 टक्के मुलींचा समावेश असून या विषयी चिल्ड्रन राइट्स अंड यू (क्राय) या संस्थेने चिंता व्यक्त करत यासाठी सरकारने आणि राज्य तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.

एनसीआरबीने आपला 2018 चा राष्ट्रीय स्तरावरील गुन्हेगारीचा एक अहवाल (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) नुकताच प्रसिद्ध केला असून त्या अहवालाचे विश्लेषण 'क्राय' या संस्थेने करत महाराष्ट्रात दररोज तीस मुलांच्या अपहरण होत असून त्यामध्ये 72 टक्के मुलींचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आणली आहे.

देशभरात होणाऱ्या मुलांच्या अपहरण आणि इतर पुण्यामध्ये ही महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे आपण घटनाचे सर्वाधिक प्रमाण असलेले हे उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली आणि बिहार सोबतच महाराष्ट्र या पाच राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये 2018 मध्ये 10 हजार 117 प्रकरणे ही केवळ अपहरण सारख्या घटना घडल्या. तर त्यात 2017 च्या तुलनेत 15.6 टक्क्यांनी वाढ झाली असल्याने सरासरी राज्यात 30 मुलांचे अपहरण केले जाते असा निष्कर्ष 'क्राय' संस्थेने आपल्या विश्लेषणात काढला आहे. त्यासोबतच मुलांच्या खुनाच्या बाबतीत ही देशभरात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असून 2017 या वर्षाच्या तुलनेत 2018 मध्ये 23 टक्‍क्‍यांची वाढ झाली असून ती राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप जास्त असल्याचा दावा 'क्राय' चे प्रतिनिधी सिध्दार्थ उघाडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केला.
राज्यात लहान मुलांच्या अपहरणाच्या होणाऱ्या गुन्हा संदर्भात राज्य सरकारने त्यांची तातडीने नोंद घेऊन त्यावर कारवाई केली पाहिजे, यासोबतच असे गुन्हे होणार नाहीत, त्यावर आळा बसेल यासाठी सरकारने आर्थिक तरतूद करून त्यावर अंकुश आणला पाहिजे, अशी मागणीही 'क्राय' कडून करण्यात आली.






Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.