ETV Bharat / city

राज्यात रुग्णसंख्येत किंचित घट; ३ हजार ३२० नवे रुग्ण, ६१ रुग्णांचा मृत्यू

author img

By

Published : Sep 23, 2021, 9:23 PM IST

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

आज गुरुवारी २३ सप्टेंबरला त्यात किंचित घट होऊन ३३२० रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात ६१ मृत्यूंची नोंद झाली असून ४०५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. रोज तीन ते चार हजारांच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी २५८३, मंगळवारी ३१३१, बुधवारी ३६०८ रुग्ण आढळून आले. आज गुरुवारी २३ सप्टेंबरला त्यात किंचित घट होऊन ३३२० रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात ६१ मृत्यूंची नोंद झाली असून ४०५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.

हेही वाचा - एक प्रभाग एक सदस्य, मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेलाच फायदा

राज्यात ३९,१९१ सक्रिय रुग्ण

राज्यात आज दिवसभरात ४०५० रुग्ण बरे होऊन घरी गेले, त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ६३ लाख ५३ हजार ०७९ झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२२ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ३३२० नवीन रुग्णांचे निदान झाले असून ६१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ३८ हजार ७२५ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ७६ लाख ४६ हजार ५१५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ३४ हजार ५५७ (११.३४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ६१ हजार ८४२ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात साध्य ३९ हजार १९१ सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्णसंख्येत चढउतार -

२६ ऑगस्टला ५१०८, ६ सप्टेंबरला ३६२६, ७ सप्टेंबरला ३९८८, ८ सप्टेंबरला ४१७४, ९ सप्टेंबरला ४२१९, १० सप्टेंबरला ४१५४, ११ सप्टेंबरला ३०७५, १२ सप्टेंबरला ३६२३, १३ सप्टेंबरला २७४०, १४ सप्टेंबरला ३५३०, १५ सप्टेंबरला ३७८३, १६ सप्टेंबरला ३५९५, १७ सप्टेंबरला ३५८६, १८ सप्टेंबरला ३३९१, १९ सप्टेंबरला ३४१३, २० सप्टेंबरला २५८३, २१ सप्टेंबरला ३१३१, २२ सप्टेंबरला ३६०८, २३ सप्टेंबरला ३३२० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

मृत्यूदर २.१२ टक्के -

१९ जुलैला ६६, २८ जुलैला २८६, ६ सप्टेंबरला ३७, ७ सप्टेंबरला ८६, ८ सप्टेंबरला ६५, ९ सप्टेंबरला ५५, १० सप्टेंबरला ४४, ११ सप्टेंबरला ३५, १२ सप्टेंबरला ४६, १३ सप्टेंबरला २७, १४ सप्टेंबरला ५२, १५ सप्टेंबरला ५६, १६ सप्टेंबरला ४५, १७ सप्टेंबरला ६७, १८ सप्टेंबरला ८०, १९ सप्टेंबरला ४९, २० सप्टेंबरला २८, २१ सप्टेंबरला ७०, २२ सप्टेंबरला ४८, २३ सप्टेंबरला ६१ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात २.१२ टक्के इतका मृत्युदर नोंदवण्यात आला आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण

मुंबई - ४९८
रायगड - १०४
अहमदनगर - ५७७
पुणे - ४३७
पुणे पालिका - १८२
पिपरी चिंचवड पालिका - १२५
सोलापूर - १९२
सातारा - २१९

हेही वाचा - मुंबईतील 67 टक्के पालक मुलांना शाळेस पाठवण्यास उत्सुक; सर्वेक्षणात स्पष्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.