ETV Bharat / city

पंचगंगा इशारा पातळीकडे, 15 तासांपासून पाणीपातळीत 6 इंच वाढ

author img

By

Published : Jul 7, 2022, 11:14 AM IST

पुन्हा एकदा जिल्ह्यात महापुराची ( Flood ) पुनरावृत्ती होते, की काय अशी भीती निर्माण झाली आहे. असे असतानाच काल दिवसभर पावसाचा जोर कमी झाल्याने पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढण्याचा वेग मंदावला आहे. गेल्या 15 ते 16 तासांपासून पंचगंगा नदीच्या ( Panchganga river ) पाणीपातळीत केवळ 6 इंचांनी वाढ झाली आहे.

पंचगंगा इशारा पातळीकडे
पंचगंगा इशारा पातळीकडे

कोल्हापूर - कोल्हापूरात ( Kolhapur Rain ) गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस ( Heavy rain ) सुरू आहे. परिणामी पुन्हा एकदा जिल्ह्यात महापुराची ( Flood ) पुनरावृत्ती होते, की काय अशी भीती निर्माण झाली आहे. असे असतानाच काल दिवसभर पावसाचा जोर कमी झाल्याने पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढण्याचा वेग मंदावला आहे. गेल्या 15 ते 16 तासांपासून पंचगंगा नदीच्या ( Panchganga river ) पाणीपातळीत केवळ 6 इंचांनी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत पंचगंगा 32.6 फुटांवरून वाहत आहे. इशारा पातळी गाठण्यासाठी अद्याप 6 ते 7 फुटांची गरज आहे. त्यामुळे असाच पाऊस राहिल्यास कदाचित धोका पातळीपर्यंत सुद्धा पाणीपातळी पोहोचणार नाही, अशी परिस्थिती आहे. मात्र, हवामान खात्याने पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा ( Heavy rain ) इशारा दिला आहे. त्यामुळे त्यावरच पुढची परिस्थिती अवलंबून असणार आहे.

पंचगंगा इशारा पातळीकडे

9 जुलैपर्यंत जोरदार पाऊस - भारतीय हवामान वेधशाळेने जिल्ह्याकरिता वर्तवलेल्या अंदाजानुसार 9 जुलैपर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषत: 8 जुलैपर्यंत रेड अलर्ट व 9 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात याच पध्दतीने पाऊस सुरु राहिला तर पंचगंगा, दूधगंगा, वारणा, हिरण्यकेशी, घटप्रभा, वेदगंगा या सर्व नद्या सद्य: स्थितीत इशारा पातळीपर्यंत उद्या 8 जुलै पहाटेपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. कालपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे आज आणि उद्या होणाऱ्या पावसावरच कोल्हापूरात महापुराची परिस्थिती निर्माण होईल, की नाही किंवा पंचगंगा धोका पातळीपर्यंत पोहोचेल का हे समजू शकणार आहे.

वेसरफ, कोदे ल.पा. तलाव पूर्ण क्षमतेने भरले - 3 दिवसांच्या पावसातच कोल्हापूरातील वेसरफ लघु पाटबंधारे, तलाव तसेच कोदे लघु पाटबंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. वेसरफ तलावातून सध्या 50 क्यूसेक इतका विसर्ग सुरू आहे, तर कोदे तलावातून 170 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील एकूण 27 बंधारे पाण्याखाली आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील नागरिकांनी 9 जुलैपर्यंत देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार सावधगिरी बाळगावी व शासकीय यंत्रणानी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी होत असल्याने डोंगराळ भागात भू:स्खलन, दरडी कोसळणे, स्थानिक नाल्यांना पूर येणे, अथवा गावठाणातील जुन्या धोकादायक घरांची पडझड, अशा घटना संभवत असल्याने नागरिकांनी आवश्यकती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे.

जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊ लागली आहे. धरण क्षेत्रात सुद्धा मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे राधानगरी धरणाचा आणखी एक स्वयंचलित दरवाजा उघडला असून एकूण 3 दरवाजांसह विद्युत विमोचकातून एकूण 5,684 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळीसुद्धा 33.7 फुटांवर पोहोचली असून जिल्ह्यातील 65 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शिवाय राज्य आणि जिल्हा मार्ग मिळून जवळपास 12 वाहतूक मार्ग बंद झाले असून पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहेत.

हेही वाचा - Mumbai Heavy Rain Update : मुसळधार पावसामुळे मुंबईची दैना! रात्रीपासून शहरात मुसळधार पाऊस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.