ETV Bharat / city

'जलपात्रं' मिटवतेय मुक्या जीवांची तहान; कोल्हापूरातल्या संस्थेच्या पुढाकाराने झालं शक्य

author img

By

Published : Mar 28, 2021, 5:54 PM IST

उन्हाच्या झळा जसजशा तीव्र होत चालल्या आहेत. तसतसे अनेक पक्षांचे पाण्याविना प्राण जात असतात. म्हणूनच या पक्षांना पिण्यासाठी पाणी मिळावं, यासाठी कोल्हापूरात अनेक सामाजिक संस्था काम करत असतात. कोल्हापूरातील 'वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन' सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून झाडं तसेच पक्षांना वाचविण्यासाठी नेमही उपक्रम राबवत असते.

कोल्हापूर - उन्हाच्या झळा जसजशा तीव्र होत चालल्या आहेत. तसतसे अनेक पक्षांचे पाण्याविना प्राण जात असतात. म्हणूनच या पक्षांना पिण्यासाठी पाणी मिळावं, यासाठी कोल्हापूरात अनेक सामाजिक संस्था काम करत असतात. कोल्हापूरातील 'वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन' सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून झाडं तसेच पक्षांना वाचविण्यासाठी नेमही उपक्रम राबवत असते. यावर्षी सुद्धा या संस्थेकडून जलपात्र तयार करायची कार्यशाळा घेऊन अनेक पक्षांना पिण्यासाठी पाण्याची सोय करण्यात आली आहे. आता त्यांनी बनविलेल्या जलपात्रामध्ये अनेक पक्ष पाणी तर पितातच शिवाय मनसोक्त अंघोळ सुद्धा करत असल्याचे सुखद दृश्ये पाहायला मिळत आहेत.


अनेक पाणवठे जलस्रोतांवर मनुष्याचे अतिक्रमण-

दिवसेंदिवस पक्षांचा ज्या ठिकाणी जास्तीत जास्त वावर असतो. त्याठिकाणी अनेकांनी अक्षरशः अतिक्रमण केले आहे. या डिजिटल युगात सिमेंटची जंगले फोफावत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणचे पाणवठे तसेच जलस्रोत पूर्णपणे नष्ट झाले आहेत. झाडंही तोडली जात आहेत. त्यामुळे हळूहळू पक्षांची संख्या कमी होत चालली आहे. वाढलेल्या प्रदूषणामुळे तर शहरामधून पक्षीच गायब झाले आहेत. उरलेल्या काही पक्षांना तरी वाचवने आपली जबाबदारी आहे. म्हणूनच आता त्यांच्यासाठी सुद्धा प्रत्येकाने पिण्याच्या पाण्याची सोय करून ठेवणे गरजेचे असल्याचे 'वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन'चे अमोल बुड्डे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

'जलपात्रं'  मिटवतेय मुक्या जीवांची तहान
'जलपात्रं' मिटवतेय मुक्या जीवांची तहान
लहानांपासून ते वृद्धांपर्यंत उपक्रमात सहभाग -पक्षी निसर्गरचनेतील अविभाज्य घटक आहे. उन्हाळ्यामुळे याच पक्षांना आपण पाण्याची सोय करणे गरजेचे आहे. म्हणूनच या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जलपात्र निर्मिती करून शहरातील विविध ठिकाणी ते लावण्यात आले आहेत. कार्यशाळेमध्ये लहानांपासून अगदी वृद्धांपर्यंत सर्वांनी उपस्थित लावून जलपात्र बनविले आहेत. अनेकांनी आपल्या टेरेस, घराबाहेर असलेल्या मोकळ्या जागेत ही जलपात्र ठेवली आहेत. त्यांनी ठेवलेल्या जलपात्रामध्ये आता अनेक पक्षी पाणी तर पिऊन जातातच शिवाय मनसोक्त आंघोळीचाही आनंद घेताना पाहायला मिळत आहेत.
'जलपात्रं'  मिटवतेय मुक्या जीवांची तहान
'जलपात्रं' मिटवतेय मुक्या जीवांची तहान

हेही वाचा- एनआयएकडून सचिन वाझेंना घेऊन मिठी नदीवर तपासणी सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.