अमरावती : सध्या राज्यात तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. पश्चिम विदर्भातही पारा हळूहळू वाढत आहे. त्यामुळे अनेक गावांत पाणी टंचाईच्या झळा बसायला सुरवात झाली आहे. पश्चिम विदर्भातील अनेक प्रकल्पांतील पाणी पातळी वाढत्या उष्णतेमुळे कमी होत आहे. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या अमरावतीतील अप्पर वर्धा धरणातील पाणीसाठा यंदा मार्च महिन्यातच 55 टक्यांवर आला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा जलसाठा 65 टक्क्यांवर होता.
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणात 55 टक्के जलसाठा
अमरावती : सध्या राज्यात तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. पश्चिम विदर्भातही पारा हळूहळू वाढत आहे. त्यामुळे अनेक गावांत पाणी टंचाईच्या झळा बसायला सुरवात झाली आहे. पश्चिम विदर्भातील अनेक प्रकल्पांतील पाणी पातळी वाढत्या उष्णतेमुळे कमी होत आहे. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या अमरावतीतील अप्पर वर्धा धरणातील पाणीसाठा यंदा मार्च महिन्यातच 55 टक्यांवर आला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा जलसाठा 65 टक्क्यांवर होता.