ETV Bharat / bharat

Odisha Train Accident : काळा आला होता पण वेळ नव्हती; ओडिशा ट्रेन दुर्घटनेत बाचवले एकाच कुटुंब तिन्ही सदस्य, सांगितली घटनेची आपबीती

author img

By

Published : Jun 3, 2023, 7:53 PM IST

रेल्वे   दुर्घटनेत बचाववलेले कुटुंब
रेल्वे दुर्घटनेत बचाववलेले कुटुंब

बालासोरमध्ये तिहेरी रेल्वेचा अपघात झाला. या अपघातात 280 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 900 पेक्षा अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत. या भीषण अपघातात पश्चिम बंगालमधील एक कुटंब बाचवले आहे. या कुटुंबाने अपघाताची आपबीती सांगितली आहे.

मेदिनीपूर (पश्चिम बंगाल) : ओडिशा राज्यातील बालासोरमध्ये झालेल्या तिहेरी रेल्वे अपघात झाला यात 280 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण आपआपल्या गावी जात होते पण कोणालाच माहिती नव्हते त्यांच्यासोबत काळ असा हल्ला करणार आहे. या रेल्वेमधील एकाही प्रवाशांच्या मनात असे काही होईल, अशी कल्पना नव्हती. या रेल्वे अपघातामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. अपघात झाला तेव्हा काय स्थिती होती याची आपबीती एका प्रवशाने सांगितली आहे.


एकाच कुटुंबातील तिघे वाचले : ओडिशातील रेल्वे अपघातात एकाच कुटुंबातील तीन सदस्य देवकृपने बचावले आहेत. अपघातातून बचावत हे तिघेजण पश्चिम बंगालमधील आपल्या घरी सुखरुप पोहोचले. सुब्रतो पाल, देबश्री पाल हे पती-पत्नी आणि त्यांचे मूल या भीषण अपघातातून बचावले आहेत. हे तिघेही पश्चिम बंगालमधील महिसादल जिल्ह्यातील , पूरबा मेदिनीपूर तालुक्यातील असलेल्या मालुबासन गावचे रहिवासी आहेत. दोन्ही नवरा-बायको आपल्या मुलाला चेन्नईमधील डॉक्टरकडे उपचारासाठी नेत होते. त्याचदरम्यान त्यांच्या रेल्वेचा अपघात झाला.

सांगितली आपबीती : रेल्वेच्या अपघातातून बचावल्यानंतर सुब्रतो पाल यांनी माध्यमाला सांगितले की, या घटनेनंतर मला नवीन जीवन मिळाल्यासारखे वाटत आहे. "आम्ही काल खरगपूर स्टेशनवरून चेन्नईला निघालो होतो. बालासोर स्टेशन सोडल्यानंतर आमच्या रेल्वेला धडक बसली. त्यानंतर रेल्वेचा डब्बा हा धुराने भरला. मला दुसरे कोणीच दिसत नव्हते. काही वेळानंतर तेथील स्थानिक माझ्या मदतीला आले. त्यांनी मला ढिगाऱ्यातून बाहेर काढले. एखाद्या देवाने मला दुसरे जीवनदान दिले असे मला वाटत असल्याचे सुब्रतो म्हणाला.

पत्नी डेबोश्री पाल ही या अपघात बचावलेली दुसरी या कुटुंबातील दुसरी व्यक्ती आहे. ती म्हणते की, अपघाताच्या वेळी तिने पाहिलेले दृश्य तिच्या मनातून कधीही जाणार नाहीत. “ हा अपघात जेव्हा झाला तेव्हा आम्ही आमच्या मुलासाठी डॉक्टरांना भेटण्यासाठी चेन्नईला जात होतो. धडक झाल्यानंतर काय झाले हे कोणालाच काही समजले नाही. धडक झाल्यानंतर रेल्वेतील लोक एकमेकांना धडकत होते. कोणालाच काही दिसत नव्हते. आम्हाला आमचा मुलगा सापडला नव्हता.

आम्ही कसे वाचलो ते माहिती नाही. हे आमच्यासाठी दुसऱ्या आयुष्यासारखे आहे. मी जिवंत असेपर्यंत ही दृश्ये माझ्या मनातून कधीच निघणार नाहीत. - डेबोश्री पाल

दरम्यान, ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या तिहेरी रेल्वे अपघातात 268 प्रवासी ठार झाले आहेत. बहनगा बाजार स्थानकावर बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी या तिहेरी रेल्वे गाड्याचा अपघात झाला होता.

हेही वाचा -

  1. Odisha Train Accident : कवच असते तर वाचला असता शेकडो प्रवाशांचा जीव, ओडीशातील तिहेरी रेल्वे अपघातासाठी कोण आहे जबाबदार?
  2. PM Modi Visit Balasore: रेल्वे अपघाताची प्रत्येक अँगलने चौकशी केली जाईल-पंतप्रधान नरेंद्र मोदी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.