ETV Bharat / bharat

Weather Today : सावलीत बसा! उन्हाचा पारा वाढला; भारतात 7 मे पासून उष्णतेची लाट

author img

By

Published : May 6, 2022, 9:30 AM IST

Updated : May 6, 2022, 9:40 AM IST

उन्हाचा पारा वाढला
उन्हाचा पारा वाढला

भारतीय हवामान विाभाने अंदाज वर्तवल्यानुसार राजस्थानमध्ये 7 'मे' ते 9 'मे' पर्यंत आणि 8 आणि 9 मे रोजी दक्षिण हरियाणा, दिल्ली, दक्षिण-पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या विदर्भात उष्णतेची लाट अपेक्षित आहे. ( Indian Meteorological Department ) उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या एकाकी भागात उष्णतेची लाट येऊ शकते असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

नवी दिल्ली - भारतीय हवामान विभागाने गुरुवारी (दि. 5 मे)रोजी सांगितले की वायव्य भारतात 7 मे पासून आणि मध्य भारतात 8 मे पासून उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने म्हटले आहे की, राजस्थानमध्ये 7 मे ते 9 मे पर्यंत आणि 8 आणि 9 मे रोजी दक्षिण हरियाणा, दिल्ली, दक्षिण-पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या विदर्भात उष्णतेची लाट अपेक्षित आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या एकाकी भागात उष्णतेची लाट येऊ शकते. ( Heat wave in India ) स्कायमेट हवामानानुसार, पुढील २४ तासांत दक्षिण कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मेघगर्जनेसह पाऊस - मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम, ओडिशाचा काही भाग, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. ( Where The Temperature Is Hot ) उत्तर राजस्थानच्या काही भागात आणि पंजाब, दिल्ली आणि हरियाणाच्या काही भागात हलका पाऊस, धुळीचे वादळ, मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो.

हलका पाऊस - किनारी आंध्र प्रदेश, रायलसीमा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि तेलंगणाच्या एक किंवा दोन भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. ( Temperature In India ) कमकुवत पाश्चात्य विक्षोभामुळे कमी पावसामुळे, वायव्य आणि मध्य भारतात या वर्षी 122 वर्षातील सर्वात उष्ण एप्रिल दिसला, सरासरी कमाल तापमान अनुक्रमे 35.9 °C आणि 37.78 °C होते.


स्कायमेट हवामानानुसार, गेल्या २४ तासांत पंजाब, उत्तर प्रदेश, ईशान्य मध्य प्रदेश, रायलसीमा, केरळ, किनारी कर्नाटक, तामिळनाडू आणि सिक्कीममध्ये हलका ते मध्यम पाऊस पडला. पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांत धुळीचे वादळ, मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीच्या हालचाली दिसून आल्या.

जम्मू आणि काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, लडाख, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे आणि तेलंगणाच्या वेगळ्या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडला. छत्तीसगड, झारखंड, बिहार, किनारी आंध्र प्रदेश, पूर्व अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड आणि लक्षद्वीप येथे काही ठिकाणी हलका पाऊस झाला. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तर छत्तीसगडचा काही भाग आणि उत्तर आणि ईशान्य मध्य प्रदेशात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशातील विविध भागांमध्ये तीव्र उष्णतेचा सामना करण्यासाठी आणि मान्सूनशी संबंधित तयारीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक झाली. अति उष्णतेमुळे किंवा आगीच्या घटनांमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) एका निवेदनात म्हटले आहे की, या बैठकीत भारतीय हवामान विभाग (IMD) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) यांनी मार्च ते मे 2022 पर्यंत देशभरातील उच्च तापमानाची माहिती दिली.


पीएमओच्या निवेदनानुसार, पंतप्रधान मोदी म्हणाले की, अति उष्णतेमुळे किंवा आगीच्या घटनांमुळे लोकांचा मृत्यू टाळण्यासाठी आम्हाला सर्व शक्य पावले उचलावी लागतील. तसेच अशा कोणत्याही घटनेवर कारवाई होण्यासाठी किमान वेळ हवा, असेही ते म्हणाले. पंतप्रधानांनी बैठकीत सांगितले की, वाढते तापमान पाहता रुग्णालयांमध्ये नियमितपणे फायर सेफ्टी ऑडिट करण्याची गरज आहे. देशभरातील वैविध्यपूर्ण वन परिसंस्थेतील जंगलातील आगीचा धोका कमी करण्यासाठी काम करण्याची गरज मोदींनी बोलून दाखवली.


संभाव्य आगीच्या घटनांचा वेळेवर शोध घेणे, आगीच्या घटना हाताळणे आणि त्यानंतरच्या पुनर्प्राप्तीसाठी वन कर्मचारी आणि संस्थांची क्षमता वाढवण्यावरही त्यांनी भर दिला. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून पाणी दूषित होणार नाही आणि जलजन्य आजार पसरणार नाहीत, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले. पीएमओने सांगितले की, बैठकीत सर्व राज्यांना नैऋत्य मान्सूनच्या तयारीबाबत 'पूर सज्जता योजना' तयार करण्याचा सल्ला देण्यात आला.


कोणत्याही परिस्थितीसाठी सर्व यंत्रणांची तयारी सुनिश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्य पातळीवरील एजन्सींमधील प्रभावी समन्वयाची गरज यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली, असे पंतप्रधान कार्यालयाने सांगितले. निवेदनानुसार, उष्णतेचा सामना करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना राज्यापासून जिल्हा आणि शहर स्तरापर्यंत कृती आराखडा तयार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नैऋत्य मान्सूनच्या तयारीच्या संदर्भात, सर्व राज्यांना पुराचा सामना करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यास आणि त्याच्या तयारीसाठी योग्य पावले उचलण्याचा सल्ला देण्यात आला.


पीएमओने सांगितले की, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाला (NDRF) पूरग्रस्त राज्यांमध्ये जवानांच्या तैनातीची योजना आखण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मचा वापर करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. या बैठकीला पंतप्रधानांचे प्रधान सचिव, पंतप्रधानांचे सल्लागार, कॅबिनेट सचिव, गृह, आरोग्य आणि जलशक्ती मंत्रालयांचे सचिव, एनडीएमएचे सदस्य, एनडीएमए आणि आयएमडीचे महासंचालक आणि एनडीआरएफचे महासंचालक उपस्थित होते.

हेही वाचा - Kedarnath Temple Open : हर हर महादेव! सहा महिन्यांनंतर उघडले केदारनाथ मंदिराचे दार

Last Updated :May 6, 2022, 9:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.