ETV Bharat / bharat

Rahul Gandhi to spend nights in containers काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेत कंटेनरमध्ये राहणार, यात्रेसाठी 60 कंटेनर बनविले

author img

By

Published : Sep 10, 2022, 1:42 PM IST

Updated : Sep 10, 2022, 2:07 PM IST

या भारत जोडो यात्रेला पोलिसांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले
Rahul Gandhi to spend nights in containers

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. या यात्रेदरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी ( Congress leader Rahul Gandhi ) भारत जोडो यात्रेत कंटेनरमध्येच ( Rahul Gandhi to spend nights in container ) राहणार आहे, असे पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षाने राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालेले 230 कॉंग्रेस नेते-कार्यकर्ते रात्री कंटेनरमध्येच राहणार आहेत. दिवसभर पदयात्रा केल्यानंतर या कंटेनरमध्ये ते आराम करू शकतील. शिवाय रात्रीतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते पोहोचू शकतील. अशा प्रकारचे 60 आधुनिक कंटेनर बनविण्यात आल्याचे पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले. काँग्रेस नेते राहुल गांधीसुद्धा ( Congress leader Rahul Gandhi ) भारत जोडो यात्रेत कंटेनरमध्येच राहणार आहेत, असे पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले.

काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेत कंटेनरमध्येच राहणार

या भारत जोडो यात्रेला उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. देशभरात ही भारत जोडो यात्रा 3,570 किमी अंतर कापल्यानंतर काश्मीरमध्ये पूर्ण होणार आहे. या यात्रेसाठी हे खास कंटेनर बनविण्यात आलेले आहेत.

कन्याकुमारी काँग्रेस नेते राहुल गांधी ( Congress leader Rahul Gandhi ) यांनी बुधवारी कन्याकुमारीमध्ये भारत जोडो यात्रेला हिरवा झेंडा (Rahul Ganghi Flaged OFf Bharat Jodo Yatra) दाखवला होता. भारत जोडो यात्रा दक्षिण ते उत्तर भारत 3,570 किमी अंतर कापल्यानंतर काश्मीरमध्ये संपेल. काँग्रेसने 'मिले कदम जुडे वतन' या यात्रेसाठी एक नाराही तयार केला आहे. या यात्रेला प्रारंभ करण्यापर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी ( Congress leader Rahul Gandhi ) यांनी त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी ( Former Prime Minister Rajiv Gandhi ) यांच्या तामिळनाडूतील श्रीपेरुंबदूर येथील स्मारकाला भेट दिली होती.

भारत जोडो यात्रा ही काँग्रेससाठी ऐतिहासिक प्रसंग आहे. आमच्या संघटनेला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास आहे, असे काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी ( Congress President Sonia Gandhi ) यांनी यात्रेच्या प्रारंभी कार्यकर्त्यांना संबोधून म्हटले होते. मी दररोज विचार आणि भावनेने सहभागी होणार आहे, असेही सोनिया गांधी यांनी म्हटले होते.

भारत जोडो यात्रेने काँग्रेस पक्षाचे भले होईल, असे म्हणत भाजपने यात्रेची खिल्ली उडविली आहे. ही यात्रा दोन भावंडांसाठी (राहुल आणि प्रियंका गांधी) आहे आणि इतर कोणीही त्यात सहभागी होणार नाही, असा दावाही भाजपने केला आहे.

Last Updated :Sep 10, 2022, 2:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.