ETV Bharat / bharat

IND vs SA 4th T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघाचा आज चौथा सामना; कोण मारणार बाजी?

author img

By

Published : Jun 17, 2022, 3:05 PM IST

IND vs SA
IND vs SA

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात चौथा टी-20 सामना ( IND vs SA 4th T20 ) शुक्रवारी राजकाेट येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक आहे. त्याचबरोबर भारताला ऋषभ पंत फार्ममध्ये परतण्याची अपेक्षा असणार आहे.

राजकोट: सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात पाच सामन्यांची टी-20 मालिका ( IND vs SA T20 Series ) खेळली जात आहे. या मालिकेतील तीन सामने पार पडले आहेत. त्यापैकी पहिल्या दोन सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर तिसऱ्या सामन्यात भारताने आपल्या विजयाचे खाते उघडले होते. आता या दोन संघात शुक्रवारी (17 जून) चौथ्या टी-20 सामना खेळला जाणार आहे. हा सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरुवात होणार आहे.

फॉर्मशी झगडत असलेल्या ऋषभ पंतला ( Captain Rishabh Pant ) मधल्या षटकांमध्ये दडपण येऊ नये म्हणून शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात चांगली खेळी खेळावी लागणार आहे. पंतच्या खराब फॉर्मशिवाय विशाखापट्टणममधील दुसऱ्या सामन्यात भारताने त्यांच्या चुकांवर मात करत मोठा विजय नोंदवला. आता या पाच सामन्यांच्या मालिकेत टिकून राहण्यासाठी त्यांना आणखी एका विजयाची गरज आहे जेणेकरून पाचव्या सामन्यात मालिकेचा निर्णय होईल.

भारतीय संघाने गेल्या सामन्यात प्रोटीज संघाचा 48 धावांनी पराभव केला आणि राजकोटमध्ये विजयाची नोंद करून मालिकेत बरोबरी साधण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. विशाखापट्टणममध्ये विजय भारतीय फिरकीपटू युझवेंद्र चहल ( Spinner Yuzvendra Chahal ) आणि अक्षर पटेल यांनी चांगली गोलंदाजी केली. चहलला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याचबरोबर हर्षल पटेलने देखील शानदार गोलंदाजी केली होती.

ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघ आपली विजयी घोडदौड सुरु ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहिल. त्याचबरोबर टेम्बा बावुमाचा ( Captain Temba Babuma ) संघ मागील सामन्यात केलेल्या चुका टाळून मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. कारण त्यांच्या संघाने या अगोदर मालिकेतील दोन सामने जिंकले आहेत. आता त्यांना मालिका आपल्या नावावर करण्यासाठी एका विजयाची गरज आहे.

भारत: ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), रुतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर, अव्वल कुमार, हर्षल पटेल, अरश पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.

दक्षिण आफ्रिका: टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अॅनरिक नॉर्किया, वेन पोर्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरीझ शमसी स्टब्स, रासी व्हॅन डर ड्यूसेन आणि मार्को यान्सेन.

हेही वाचा - World Chess Olympiad Torch Relay : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पेटवली जाणार 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडची मशाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.