ETV Bharat / bharat

Sarfaraz Ahmed on Ind vs Pak पाकिस्तानच्या पराभवावरुन गदारोळ, महिला पत्रकारावर भडकला सरफराज अहमद, जाणून घ्या प्रकरण

author img

By

Published : Aug 30, 2022, 5:51 PM IST

Sarfaraz Ahmed
Sarfaraz Ahmed

आशिया चषक 2022 Asia Cup 2022 मधील पहिल्या सामन्यात भारताविरुद्ध पाकिस्तानला 5 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला, तेव्हापासून पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. माजी कर्णधार सर्फराज अहमदने Former captain Sarfraz Ahmed पाकिस्तानातील एका महिला पत्रकाराने केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेत ट्विट केले आहे. या ट्विटवरून चाहते एकमेकांसोबत भिडले आहेत.

दुबई : आशिया चषक Asia Cup 2022 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात जबरदस्त सामना झाला आणि टीम इंडियाने बाजी मारली. टीम इंडियाने धमाकेदार सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवला, त्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञ पाकिस्तानी संघावर टीका करत आहेत, तर काही क्रिकेटपटूंनीही पाकिस्तानच्या संघर्षाचे कौतुक केले.

दरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार सर्फराज अहमदचे एक ट्विट Former captain Sarfraz Ahmed tweet चर्चेत आहे, ज्यामध्ये त्याने पाकिस्तानच्या एका महिला पत्रकारला फटकारले Sarfraz Ahmed scolded the woman journalist आहे. सर्फराज अहमदने ट्विट करून लिहिले की, 17 व्या षटकानंतर पाकिस्तान संघाचे नुकसान झाले, स्लो ओव्हर रेटमुळे पाच क्षेत्ररक्षक सर्कलच्या आत (30 यार्ड) ठेवावे लागले.

  • Pak had the disadvantage after 17th over 5 fielders were inside the circle cuz of slow over rate & 1 of the so called female journalist on national Tv bashing Pakistan team after a fighting match & saying na run karte hai na catch pakarte hai kamal hai bhi🤷‍♂️ #headsUpBoys 🇵🇰

    — Sarfaraz Ahmed (@SarfarazA_54) August 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सरफराज अहमदने लिहिले की, एक महिला पत्रकार नॅशनल टीव्हीवर पाकिस्तानी संघावर भडकत आहे, तोही संघर्षमय सामना झाला तेव्हा. महिला पत्रकार सांगत आहेत की ते धावा करत नाहीत आणि झेल सुद्धा पकडत नाहीत. कमाल आहे भाय.

पाकिस्तानी महिला पत्रकार आलिया रशीदने Pakistani female journalist Alia Rashid एका टीव्ही कार्यक्रमात पाकिस्तानी संघावर टीका केली होती. ज्यामध्ये ती म्हणाली की फखर जमानकडून झेल घेतला जात नाही आणि तो धावा देखील करू शकत नाही. अशा परिस्थितीत पाकिस्तानी संघाच्या कमकुवतपणा समोर येत आहेत.

  • Pak had the disadvantage after 17th over 5 fielders were inside the circle cuz of slow over rate & 1 of the so called female journalist on national Tv bashing Pakistan team after a fighting match & saying na run karte hai na catch pakarte hai kamal hai bhi🤷‍♂️ #headsUpBoys 🇵🇰

    — Sarfaraz Ahmed (@SarfarazA_54) August 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पाकिस्तानच्या माजी कर्णधाराच्या या ट्विटवर सोशल मीडियावर चाहते देखील आमने सामने आले. अनेक पाकिस्तानी युजर्सनी सर्फराजला पाठिंबा देत लिहिले की, पाकिस्तान संघाने चांगली कामगिरी केली आणि शेवटपर्यंत भारताविरुद्ध लढा दिला. त्याचबरोबर काही युजर्सनी लिहिले आहे की, हार ही हारच आहे, पाकिस्तानी संघाने अनेक चुका केल्या आहेत ज्या कोणत्याही प्रकारे विसरण्यासारख्या नाहीत.

सामन्यात पाकिस्तानचा अशा प्रकारे पराभव झाला

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 147 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 20 व्या षटकात ही धावसंख्या गाठली. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने Batsman Mohammad Rizwan सर्वाधिक 43 धावा केल्या होत्या, त्याच्याशिवाय कोणताही फलंदाज चमत्कार करू शकला नाही.

  • Bhai india ka bhi same tha 17 over ke baad jab dekh liya indiia ke sath esa hua uske baad bhi sheek nhi ki to bhut hi lull ho fir..

    — Subodh Mishra (@Subodhmiahra98) August 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

त्याच वेळी, भारताच्या बाजूने, हार्दिक पांड्याने All-rounder Hardik Pandya प्रथम गोलंदाजी आणि नंतर फलंदाजीमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली. हार्दिकने पाकिस्तानविरुद्ध 3 बळी घेतले, फलंदाजी करताना 17 चेंडूत 33 धावा केल्या. ज्यामध्ये विनिंग सिक्सरचाही समावेश होता.

हेही वाचा - US Open First Round Match सेरेना विल्यम्सने पहिल्या फेरीत माँटेनिग्रोच्या डंका कोविनिकचा केला पराभव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.