ETV Bharat / bharat

Congress Sankalp 2024 : अदानींवरून राहुल, प्रियंका गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका, खरगेंचाही हल्लाबोल

author img

By

Published : Feb 26, 2023, 9:42 PM IST

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये काँग्रेसच्या ८५व्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी मोदींवर टीका करत कार्यकर्त्यांना संबोधित केले. सामूहिक परंपरेचे पालन करून संविधान बळकट करण्याबाबत त्यांनी प्रयत्न करणायची गरज असल्याचे मत मांडले. दुसरीकडे, छत्तीसगडमध्ये ईडी आणि इन्कम टॅक्सने टाकलेल्या छाप्यांमध्ये उद्योगपती, अदानी यांची बाजू घेत असल्याबद्दल केंद्र सरकारला त्यांनी फटकारले. जोपर्यंत अदानी प्रकरणातील सत्य समोर येत नाही तोपर्यंत काँग्रेस शांत बसणार नाही असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Congress sankalp 2024
Congress sankalp 2024

रायपूर : रायपूरमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. 'अदानी, पंतप्रधान नरेंद्र मोदी एक आहेत. देशाची संपूर्ण संपत्ती एका माणसाच्या हातात जात आहे. जेव्हा आम्ही संसदेत प्रश्न विचारतो, तेव्हा माझे तसेच मल्लिकार्जुन खरगेचे भाषण हटवले जाते. मात्र, जोपर्यंत सत्य समोर येत नाही तोपर्यंत आम्ही हजार वेळा प्रश्न विचारू' असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

शेल कंपन्यांमध्ये कोणाचे पैसे गुंतवले?: राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करीत विचारले की, 'हजारो कोटी रुपये भारतात पाठवणाऱ्या या शेल कंपन्यात कोणाचे पैसे आहेत? अदानी समुह संरक्षण उद्योगात काम करतात पण, मोदी सरकारला हे माहित नाही. की अदानींच्या शेल म्हणजेच बनावट कंपन्या विदेशात आहेत. याचा तपास का होत नाही, जेपीसी का स्थापन होत नाही? हा देशाच्या रक्षणाचा प्रश्न आहे. असेही राहुल गांधी म्हणाले. काँग्रेस अदानी समुहाला प्रश्न विचारतच राहणार आहे. जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत काँग्रेस मागे हटणार नसल्याचे गांधी म्हणाले.

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्यावर निशाणा : मोदी सरकारचे एक मंत्री म्हणाले चीनची अर्थव्यवस्था भारतापेक्षा खूप मोठी आहे, मग त्यांच्याशी लढायचे कसे? इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले तेव्हा त्यांची अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा लहान होती का? याचा अर्थ जो तुमच्यापेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे त्याच्यापुढे आपले डोके टेकवणार का अशी टीका त्यांनी जयशंकर यांच्यावर केली.

अदानींच्या संपत्तीत मोदींमुळे वाढ : 'शेतकरी दररोज 27 रुपये कमवत आहे. मात्र, पंतप्रधानांचे मित्र 1600 कोटी कमवत आहेत आज भारतात कोणाला संधी मिळत आहे'. राज्याच्या धोरण तुम्हाला वाचवत नसेल तर, केंद्राची धोरणे तुमचा विनाश करतील. असा हल्ला प्रियंका गांधी यांनी मोदीवर केला आहे. देशातील शेतकरी दररोज 27 रुपये कमवत आहे. पंतप्रधानांचा मित्र रोज 1600 कोटी कमावतो. देशातील करोडो तरुण बेरोजगार आहेत. कोळसा, रस्ते, सार्वजनिक उपक्रम आणि विमानतळ हे सर्व पंतप्रधानांचे मित्र असलेल्या अदानी यांना दिले आहेत. 3 वर्षात अदानीची संपत्ती अनेक पटींनी वाढली आहे. अदानी यांना बँकांकडून 80 हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळाले आहे याला भाजप जबाबदार असल्याचे ते प्रियंका गांधी म्हणाल्या.

मित्र का साथ मित्र का विकास : सबका साथ सबका विकास नाही, तर मित्र का साथ मित्र का विकास करता आहेत. पंतप्रधानांपासून मंत्र्यांपर्यंत, लोकसभा सदस्य सर्वच अदानी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे. या देशात गरिबांचे ऐकले जात नाही. काही निवडक उद्योगपतींचेच ऐकले जात आहे. प्रियांका गांधींनी जनतेला आवाहन केले आहे की, तुम्ही हे सत्य ओळखले पाहिजे. सबका साथ आणि सबका विकास हा नारा आता मित्राचा विकास झाला असल्याचे प्रियंका गांधी म्हणाल्या.

अदानी संपत्तीत वाढ : मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, "केंद्र सरकार लोकशाही विरोधी आहे. हे सरकार लोकांसाठी काम करणारे सरकार नाही. हे फक्त हुकूमशाही चालवणारे सरकार आहे. सरकारने दलित, गरिबांचे रक्षण करायला हवे. वंचितांना, आज बोलण्याचे स्वातंत्र्य नाही. आम्ही तुमचा संसदेत आवाज उठवला. आम्ही अदानीच्या संपत्तीचा हिशेब मागितला. अडीच वर्षात अदानीची संपत्ती अनेक पटींनी वाढली. तुम्ही अदानींना शिकवलेला मंत्र सांगा. एक रुपया अडीच वर्ष तेरा रुपये कसा होते असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तुम्ही एका अदानीसाठी संपूर्ण भारत उद्धवस्त करणार का असा प्रश्न देखील त्यांनी मोंदीना विचारला.

खरगेंचा मोदी सरकारला टोला : मोदींवर खिल्ली उडवत खरगे म्हणाले, मोदी म्हणतात ना मैं खाऊंगा, ना खाने दुंगा. कोणी पैसे खात नाही. पण आमची संपत्ती विकली जात आहे. सरकारला कशाची भती नसेल तर, ईडी छापेमारी विरोधकांवर का करत आहे असा प्रहार त्यांनी मोंदीवर केला.

मोदींनी अनेक कंपन्या विकल्या : 'भिलाई जगाच्या नकाशावर आणण्यासाठी आम्ही काम केले. मोदींकडे नोटांची ताकद असेल तर, आमच्याकडे मतांची ताकद आहे. लोकशाहीत जनता ही सर्वात मोठी शक्ती आहे. भिलाईला छत्तीसगड जगाच्या नकाशावर आणण्याचे काम आम्ही केले. भिलाई स्टील प्लांटची स्थापना झाली. त्या वेळी मोदींचे वय ५५ वर्षे होते. आम्ही भाक्रा नांगल धरण बांधले. नेहरूजींच्या काळात अनेक कारखाने सुरू झाले. शास्त्रींच्या काळात 5 सार्वजनिक क्षेत्रे निर्माण झाली. मोदींनी काय केले? मोदींनी नफा कमावणारे सार्वजनिक क्षेत्र' विकल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजप देशाला नष्ट करणार : दरवर्षी तरुणांना 2 कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. हा फक्त निवडणूक जिंकण्यासाठी मोदींचा जुमला होता : गरुड उडत असेल तर म्हैस उडते असे म्हणात. मोदीही तेच करतात. दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन या नौटंकींबाजांनी दिले होते. हे लोक देशाला नष्ट करणारे आहेत अस हल्लाबोल खरगेंनी मोदींवर केला.

बदला घेण्यासाठी ईडीचा वापर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. रायपूरमध्ये अशोक गेहलोत म्हणाले की, "संविधानाचे रक्षण केले पाहिजे. केंद्र सरकार लोकशाही आणि राज्यघटनेची पायामल्ली करीत आहे. तणाव आणि हिंसाचाराचे वातावरण आहे. महागाईचा मुद्दा, आणि बेरोजगारी मोठी आहे. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढत आहे. सरकारवर टीका केली तर देशद्रोही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बदला घेण्यासाठी इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडीचा वापर केला जात असल्याचा आरोप गेहलोत यांनी केला आहे.

गेहलोत यांचा अमित शहांवर हल्ला : 'छत्तीसगड आणि राजस्थानने कर्जमाफी, जाहीरनाम्याची आश्वासने पूर्ण केली. छत्तीसगड सरकारनेही नवनवीन प्रयोग केले आहेत. मोदी आणि शहा यांनी घोडे-व्यापार करून निवडून आलेली सरकारे पाडण्याचे नवे मॉडेल आणले आहे. राजस्थानमध्ये, छत्तीसगडमध्ये त्यांची सरकार पाडण्याची हिंमत झाली नाही. संपूर्ण देशात धोकादायक वातावरण आहे. तुम्ही सर्वांनी समजून घेतले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - CM Food Bill : अबब! मुख्यमंत्री शिंदेंच्या जेवणाचे बिल 2 कोटी; चहात सोन्याचे पाणी वापरले का?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.