महाराष्ट्र

maharashtra

अमिताभ बच्चनची कारकीर्द उजवळणारे मनमोहन देसाई, 23 पैकी 15 चित्रपट ब्लॉकबस्टर बनवणार निर्माता

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 26, 2024, 5:19 PM IST

Manmohan Desai birth anniversary : बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते मनमोहन देसाई यांची आज ८७ वी जयंती आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत सिव्हर ज्युबिली आणि गोल्डन ज्युबली निर्मिती करण्याचा विक्रम त्यांनी आपल्या कारकिर्दीत रचला होता. त्यांनी निर्माण केलेल्या 23 चित्रपटांपैकी 15 ब्लॉकबस्टर ठरले होते. अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीला आकार देण्याचं काम मनमोहन देसाईंनी केले.

Manmohan Desai birth anniversary
अमिताभ बच्चनची कारकीर्द उजवळणारे मनमोहन देसाई

मुंबई - Manmohan Desai birth anniversary : हिंदी चित्रपट सृष्टीला लोकप्रियतेच्या कळसावर पोहोचवण्यात मनमोहन देसाई यांचे योगदान खूप मोठे आहे. त्यांना चित्रपटा निर्मितीचा वारसा त्यांचे वडील किकूभाई यांच्याकडून मिळाला होता. किकुभाई देसाई यांनी 1931 मध्ये पॅरामाउंट फिल्म स्टुडिओची स्थापना केली आणि अनेक अ‍ॅक्शन चित्रपटांची निर्मिती केली. खरे तर मनमोहन देसाई चार वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यावर प्रचंड कर्ज झाल्याचे उघड झाले. चित्रपट बनवण्यासाठी त्यांनी खूप कर्ज घेतले होते जे ते फेडू शकले नाहीत. कर्जदार त्याच्या घरी येऊ लागले. मनमोहन यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. यानंतर संपूर्ण कुटुंबाला रस्त्यावर यावे लागले. सर्व जमीन आणि मालमत्ता विकून कसेतरी कर्ज फेडले गेले. यानंतर संपूर्ण कुटुंबाने किकूभाईच्या कार्यालयात आसरा घेतला आणि दिवस काढले.

अमर अकबर अँथनी

मनमोहन देसाई मोठे झाल्यावर त्यांनी चित्रपटसृष्टीत काम शोधायला सुरुवात केली. यात त्यांना चित्रपट निर्माते सुभाष घई यांनी मदत केली. त्यांनी एका चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मनमोहन देसाई यांचे नाव सुचवले होते. यानंतर देसाई यांनी दीर्घकाळ सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत राहिले. परंतु त्यांना दिग्दर्शक व्हायचे होते. त्यांना राज कपूर आणि नूतनला कालाकार म्हणून घेऊन चित्रपट बनवायचा होता. सुभाष घईंनी ही गोष्ट राज कपूर यांना सांगितली तेव्हा हे अशक्य असल्याचं सांगितलं. कारण त्यावेळी मनमोहन यांचं वय अवघ्या 20 वर्षांचं होतं. त्यावेळी मनमोहन देसाई राज कपूरना म्हणाले की, 'जेव्हा तुम्ही तुमचा पहिला चित्रपट केला होता तेव्हा तुम्ही त्याच वयाचे होते'. यानंतर मनमोहन देसाई यांनी राज कपूर यांना छलिया चित्रपटाची ऑफर दिली. नूतननेही या चित्रपटात काम करण्यास होकार दिला, पण राज कपूरने देसाईंना स्पष्टपणे सांगितले होते की, 'जर तुम्हाला चित्रपटातील गाणी नीट चित्रित करता आली नाहीत, तर मी चित्रपट अर्धवट सोडेन.'

परवरीश

चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आणि 'दम दम डिगा डिगा' या चित्रपटाचे पहिले गाणे शूट झाले. देसाईंचे काम पाहून राज कपूर खूश झाले आणि चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्यातील गाणी खूप लोकप्रिय झाली आणि त्यामुळे देसाईंना त्यांच्या पहिल्याच चित्रपटापासून दाद मिळू लागली.

सुहाग

यानंतर त्यांनी शम्मी कपूरसोबत ब्लफमास्टर, राजेश खन्नासोबत सच्चा झूठा और रोटी, रणधीर कपूरसोबत रामपूर का लक्ष्मण आणि जीतेंद्रसोबत भाई हो तो ऐसा असे सुपरहिट चित्रपट केले. पण मनमोहन देसाई यशाचं शिखर दाखवणारा चित्रपट ठरला अमर अकबर अँथनी. यामध्ये अमिताभ बच्चन, ऋषी कपूर आणि विनोद खन्ना यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाने मुंबईतील २५ चित्रपटगृहांमध्ये रौप्यमहोत्सव साजरा केला होता.

गंगा जमून सरस्वती

1977 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची कल्पना मनमोहन देसाई वर्तमानपत्रात छापून आलेल्या एका बातमीमुळे सूचली होती. एका व्यक्तीने आपल्या तीन मुलांना बागेत एकटेच खेळायला सोडून देऊन आत्महत्या केली होती. देसाई अनेक दिवस या बातमीचा विचार करत राहिले आणि मग एके दिवशी त्यांची भेट चित्रपट लेखक प्रयाग राज यांच्याशी झाली. त्यांनी या कथेचा विस्तार केला आणि चित्रपटाची कथा तयार झाली. पुढे या चित्रपटाने इतिहास रचला.

मर्द

1977 मध्ये मनमोहन देसाईंचे एकापाठोपाठ एक चार चित्रपट प्रदर्शित झाले आणि ते सर्व ब्लॉकबस्टर ठरले. हे चार चित्रपट होते, परवरिश, धरम वीर, चाचा भटिजा आणि अमर अकबर अँथनी. यापैकी अमर अकबर अँथनी हा पहिला चित्रपट होता ज्यात देसाई यांनी अमिताभ बच्चन यांना दिग्दर्शित केले होते. त्यानंतर मनमोहन देसाई आणि अमिताभ बच्चन यांनी 8 चित्रपट एकत्रीत केले. त्यापैकी 7 चित्रपट सुपरहिट ठरले होते. अमर अकबर अँथनी, सुहाग, नसीब, देशप्रेमी, कुली, मर्द, तुफान आणि गंगा जमना सरस्वती नंतर त्यांनी जे काही चित्रपट बनवले त्यात सर्वांचा नायक होता अमिताभ बच्चन.

कुली

या चित्रपटांमुळे मनमोहन देसाई मोठे दिग्दर्शक झाले. यासोबतच अमिताभ बच्चन यांची कारकीर्दही उजळली. यामुळेच अनेक प्रसंगी अमिताभ बच्चन यांनी आपल्या उत्कृष्ट कारकिर्दीचे श्रेय ज्या दिग्दर्शकांना दिले आहे त्यात मनमोहन देसाई यांचेही नाव अग्रक्रमाने घेतले गेले आहे.

देश प्रेमी
नसीब

हेही वाचा -

  1. सिद्धार्थ मल्होत्राने नवीन पोस्टरसह 'योद्धा' चित्रपटाच्या ट्रेलरची वाढवली उत्कंठा
  2. अभिनेत्री तब्बूने केकसह क्रूचे शूटिंग पूर्ण झाल्याची केली घोषणा
  3. सामंथाची फिल्म इंडस्ट्रीत 14 वर्षे, समकालीन नयनताराने दिल्या शुभेच्छा

ABOUT THE AUTHOR

...view details