महाराष्ट्र

maharashtra

Eco Friendly Diwali : यंदाच्या दिवाळीला शेणापासून बनवलेल्या पणत्यांना मोठी मागणी

By

Published : Nov 6, 2021, 6:12 PM IST

ठाणे - पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने प्रत्येक जण पर्यावरणपूरक सण साजरे करत असतात. यंदाच्या दिवाळीत देखील पर्यावरणपूरक म्हणजेच शेणापासून बनलेल्या आयुर्वेदिक पणत्या बाजारात आल्या आहेत. त्यांची मागणीही जास्त असून, याचा खपही मोठा आहे. शेणाचे दिवे जळत असताना त्यातून कार्बन डाय-ऑक्साईड ऐवजी ऑक्सिजन बाहेर पडत असतो. त्यामुळे हे दिवे आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक आहेत. हे दिवे जळत असताना सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होते. शेणापासून बनलेले दिवे, पणत्या, अगरबत्ती, धूप यासारख्या वस्तू बाजारात उपलब्ध आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details