महाराष्ट्र

maharashtra

सरकारने शिवाजी स्मारकाचे आश्वासन पाळले नाही - शरद पवार

By

Published : Oct 19, 2019, 1:14 PM IST

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारार्थ पंढरपुरात शरद पवारांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवारांनी भाजप सरकारकडून होणारा सरकारी यंत्रणाचा गैरवापर यासह इतर मुद्द्यावर चौफेर टीका केली.

शरद पवार

सोलापूर- या सरकाने कोणतेही आश्वासन पाळले नाही. मग ते शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे असो किंवा बाबासाहेबांच्या स्मारकाचे. आजपर्यंत माझ्यावर कोणता गुन्हा दाखल नव्हता. मात्र, भाजपने तो दाखल केला आहे. सीबीआय, आयबी, ईडी या सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग हे सरकार करत आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ते पंढरपूर येथील आयोजित प्रचार सभेत बोलत होते.

शरद पवार सभेत बोलताना

हेही वाचा - 'त्या' वक्तव्याबद्दल राऊतांविरोधात बार्शीत मूक मोर्चा

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारार्थ पंढरपुरात शरद पवारांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवारांनी भाजप सरकारकडून होणारा सरकारी यंत्रणाचा गैरवापर यासह इतर मुद्द्यावर चौफेर टीका केली.

हेही वाचा - करमाळा : कन्याकुमारी एक्सप्रेसला रेल्वेरुळावर दगड ठेवून अडवण्याचा प्रयत्न

यावेळी पवार म्हणाले, तरुण पिढीच्या हाताला काम दिले पाहिजे होते. मात्र, या 5 वर्षात निम्मे कारखाने बंद पडले आहेत. अनेक कारखाने आजारी आहेत. सरकार कोणतेही याबाबत ठोस पाऊल उचलत नाही. तर नवीन आदर्श पिढी निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवायची गरज असताना, पुस्तकातून महाराजांचा इतिहास पुसण्याचे काम हे सरकार करत आहे, असेही पवार म्हणाले.

Intro:सोलापूर : आजपर्यंत माझ्या वर कोणता गुन्हा नव्हता मात्र भाजपने तो दाखल केला सीबीआय,आयबी,ईडी या सरकारी यंत्रणेचा वापर हे सरकार करीत आहे. माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांना जेल मध्ये टाकले अनेकांवर गुन्हे दाखल करीत कारवाई केलीय.असा आरोप शरद पवार यांनी पंढरपुरातल्या सभेत केलाय.पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारार्थ पंढरपुरात पवारांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी पवारांनी भाजप सरकारकडून होणारा सरकारी यंत्रणाचा वापर यासह इतर मुद्द्यावर चौफेर टीका केली...Body:तरुण पिढीच्या हाताला काम दिले पाहिजे होते मात्र या पाच वर्षात निम्मे कारखाने बंद झाले आहेत, अनेक कारखाने आजारी आहेत.सरकार कोणतेही याबाबत ठोस पाऊल उचलत नाही असा गंभीर आरोप पवार यांनी यावेळी केला.तसंच आदर्श नवीन पिढी निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवायची गरज असताना हे पुस्तकातून महाराजांचा इतिहास पुसण्याचे काम हे सरकार करीत आहे.
Conclusion:या सरकाने कोणतेही आश्वासन पाळले नाही मग ते शिवाजी महाराज स्मारकाचे असो किंवा बाबासाहेबांच्या स्मरकाचे असा आरोपही पवारांनी केला. या सभेत तरुणाईचा प्रचंड जोश दिसून आला हे हे पाहून स्वतः पवारही आवक झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details