महाराष्ट्र

maharashtra

मला मोदी-शाहांची काळजी वाटते, झोपेतसुद्धा ते माझ्या नावाने चवताळून उठत तर नसतील ना? - पवार

By

Published : Oct 16, 2019, 3:55 AM IST

Updated : Oct 16, 2019, 7:16 AM IST

झोपेतही ते शरद पवार म्हणत चवताळून उठत तर नसतील ना? अशा शब्दात शरद पवारांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाहंची खिल्ली उडवली आहे. सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप सरकार व नेत्यांवर सडकून टीका केली. तासगाव तालुक्यातील मणेराजूरी येथे आयोजित या प्रचार सभेसाठी उमेदवार सुमनताई पाटील, काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष आमदार विश्वजित कदम,राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी

सांगली -मला मोदी आणि शाहांची काळजी वाटते. झोपेतही ते शरद पवार म्हणत चवताळून उठत तर नसतील ना? अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाहांची खिल्ली उडवली आहे. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमनताई पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत पवार बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

सभेत शरद पवार यांनी भाजप सरकार व नेत्यांवर सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून होणाऱ्या टीकेचा समाचार घेताना पवार म्हणाले, "महाराष्ट्रात पंतप्रधान येवो अथवा गृहमंत्री येवो भाषणात त्यांच्या बोलण्यात कायम एकच गोष्ट. मला त्यांची काळजी वाटते. ते दोघे झोपोतसुद्धा माझ्या नावाने चवताळून उठत तर नसतील ना? अशी शंका येते"

हेही वाचा -मुख्यमंत्र्यांनी तेल लावलेला एक तरी फोटो प्रसिध्द करावा - जयंत पाटील

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारू, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलमध्ये स्मारक उभारू असे सांगितले. मात्र, गेल्या तीन वर्षात एक इंचही काम पुढे सरकले नाही. शिवाय महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर हॉटेल सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. ज्या गडांवर छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार तळपली तिथे आता हे छमछम सुरू करणार का? असा संतप्त सवालही पवार यांनी यावेळी उपस्थित केला. तासगाव तालुक्यातील मणेराजूरी येथे आयोजित या प्रचार सभेसाठी उमेदवार सुमनताई पाटील, काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष आमदार विश्वजित कदम,राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Intro:File name - mh_sng_05_sharad_pawar_on_bjp_vis_01_7203751 - mh_sng_05_sharad_pawar_on_bjp_byt_04_7203751


स्लग - मला नरेंद्र मोदी आणि अमित शहांची काळजी वाटते,झोपेत पण मीच दिसत तर नाही - शरद पवार...

अँकर - मला नरेंद्र मोदी आणि अमित शहांची काळजी वाटते,कारण झोपेत ही शरद पवार म्हणत चवताळून उठत नसतील ना,अश्या शब्दात शरद पवारांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहांची खिल्ली उडवली आहे, सांगलीच्या तासगाव विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमनताई पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत शरद पवार बोलत होते. Body:सांगलीच्या तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुमनताई पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची जाहीर सभा पार पडली. तासगाव तालुक्यातील मणेराजूरी येथे आयोजित या प्रचार सभेसाठी उमेदवार सुमनताई पाटील,काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष
आमदार विश्वजित कदम,राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील,व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी या सभेत बोलताना शरद पवार यांनी भाजप सरकार व नेत्यांच्यावर सडकून टीका केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून होणाऱ्या टीकेचा समाचार घेताना महाराष्ट्रात पंतप्रधान येवो अथवा गृहमंत्री येवो भाषणात एकच गोष्ट शरद पवार,शरद पवार.मला त्यांची कधी कधी काळजी वाटते,हे दोघे झोपेत ही शरद पवार, शरद पवार म्हणत चवताळून उठतात का,अशी शंका येते अश्या शब्दात पवारांनी मोदी व शहा यांच्यावर केली आहे.तसेच हे नेते येऊन आम्हाला प्रश्न विचारतात तुम्ही काय केले म्हणून ? पण गेली पाच वर्षे केंद्रात आणि राज्यात तुम्ही सत्तेत आहात.आणि तुम्ही काय दिवे लावलेत ते आम्ही पाहतोय,वर आम्हालाच विचारताय, तुम्ही काय केलं म्हणुन , अशी टीका पवारांनी यावेळी केली .

तसेच अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारू,डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलमध्ये स्मारक उभारू असे सांगितले, मात्र गेल्या तीन वर्षात एक इंचही काम पुढे सरकत नाही. शिवाय महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर हॉटेल सुरू करण्याचा निर्णय तुम्ही घेतला.गडांवर छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार तळपली तेथे आता हे छमछम सुरू करणार बार सुरू करणार आणि वर आम्हाला विचारताय तुम्ही काय केले म्हणून ? कसं आणि कुणासाठी राज्य करताय ? असा संतप्त सवाल यावेळी शरद पवार यांनी उपस्थित केला .

तर आम्ही सरकारला चांगले काय केले ? असे विचारले की सांगतात,३७० कलम दूर केले.आता म्हणतात परत लावून दाखवा. कोणताही प्रश्न विचारा उत्तर एकच ३७०, शेती बद्दल विचारा उत्तर 370,उद्योग बंद का पडत आहेत उत्तर ३७०, तरुणांना काम नाही उत्तर ३७०,मान्य आहे तुम्ही ३७० कलम दूर केले,आमची काही तक्रार नाही,पण त्यापेक्षा ही अनेक प्रश्न आहेत. त्यांची सोडवणूक करण्यासाठी सत्तेचा वापर व्हायला हवा,असा पंतप्रधान मोदी आणि शहा यांना लगावला आहे.

बाईट :- शरद पवारConclusion:
Last Updated :Oct 16, 2019, 7:16 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details