महाराष्ट्र

maharashtra

केंद्रात भाजप सरकार असल्याने सेनेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न - आमदार मनीषा कायंदे

By

Published : Jan 20, 2020, 11:26 PM IST

भाजप आणि शिवसेना 2014 साली वेगवेगळे लढले. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला तेव्हाही बहुमत मिळाले नव्हते. 122 आमदारांच्या जोरावर तेव्हा भाजपने सत्ता स्थापन केली. तेव्हा कोणते अदृश्य हात आपल्या मागे होते? ते स्पष्ट करा, असेही कायंदे म्हणाल्या.

आमदार मनीषा कायंदे
आमदार मनीषा कायंदे

मुंबई - लोकसभा 2014 च्या निवडणूक निकालानंतर मोदी लाटेमुळे विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेशी युती तोडली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ खडसे यांनी युती तुटल्याची घोषणा केली होती. त्यानंतर 2014 मध्ये भाजप राष्ट्रीय स्तरावर पूर्ण बहुमतात सत्तेत आल्यावर सतत शिवसेनेचे खच्चीकरण करू पाहत आहे. हे लक्षात आल्यावर शिवसेनेने आपला स्वतंत्र बाणा जपून राजकीय सोयरीक करण्याचा प्रयत्न केला असला तर त्यात वावगे काय? असा सवाल करत शिवसेना प्रवक्त्या आणि आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला.

भाजप आणि शिवसेना 2014 साली वेगवेगळे लढले. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला तेव्हाही बहुमत मिळाले नव्हते. 122 आमदारांच्या जोरावर तेव्हा भाजपने सत्ता स्थापन केली. तेव्हा कोणते अदृश्य हात आपल्या मागे होते? ते स्पष्ट करा, असेही कायंदे म्हणाल्या. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेने जे काही केले ते खुलेआम केले. आपल्याच युतीतील सहकारी पक्षातील लोकांचे आणि आपल्याच पक्षातील नेत्यांचे छुप्या पद्धतीने खच्चीकरण करण्याचे कारनामे कधी उद्धव ठाकरेंनी केले नाही, असा अप्रत्यक्ष टोलाही आमदार कायंदे यांनी फडणवीसांना लगावला.

Intro:
मुंबई - लोकसभा 2014 च्या निवडणूक निकालानंतर मोदी लाटेमुळे विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेशी युती तोडली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ खड़से यांनी युती तुटल्याची घोषणा केली होती.
त्यानंतर 2014 मधे भाजप राष्ट्रीय स्तरावर पूर्ण बहुमतात सत्तेत आल्यावर सतत शिव
सेनेचे खच्चीकरण करू पाहत आहे हे लक्षात आल्यावर शिवसेनेने आपला स्वतंत्र बाणा जपून राजकीय सोयरीक करण्याचा प्रयत्न केला ही असला तर त्यात वावगे काय ? असा सवाल करत शिवसेना प्रवक्त्या व आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी उपस्थित करत उद्धव साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेने जे केले ते खुलेआम केले असे
फडणवीसांच्या टीकेला शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिल.
Body: 2014 साली भाजप शिवसेना वेगवेगळे लढले आणि सर्व शक्तिमान असलेल्या भाजपला तेव्हाही बहुमत मिळाले नव्हते. 122 आमदारांच्या जोरावर तेव्हा भाजपने सत्ता स्थापन केली. तेव्हा कोणते अदृश्य हात आपल्या मागे होते ते स्पष्ट करा असा सवाल देखील भाजपने उपस्थित केला.
आपल्याच युतीतील सहकारी पक्षातील लोकांचे आणि आपल्याच पक्षातील नेत्यांचे छुप्या पद्धतीने खच्चीकरण करण्याचे कारनामे कधी उद्धव साहेबांनी केले नाहीत असा टोला देखील कायंदे यांनी फडणवीसांना लगावला.
Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details