सोलापूर - देशात पारंपरिक सण आणि उत्सवांना महत्व असून, ते साजरे करताना पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. दिवाळीत फटाक्यांमुळे वायू आणि ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी सर्वांनी पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी असे प्रयत्न सोलापूर जिल्हा प्रशासन करत आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे दोन महिने एकही वाहन धावले नव्हते. त्यामुळे शहराचे वातावरण प्रदूषणमुक्त झाले होते. पण जसजसे कोरोनाची तीव्रता कमी होत गेली, पुन्हा प्रदूषण वाढत गेले. फटाक्यांमुळे ध्वनी प्रदूषण तर होतच आहे, तसेच वायू प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. सोलापूरच्या स्थानिक पोलीस प्रशासनाने फटाक्यांच्या दुकानांवरसुद्धा कारवाई केली आहे. पण हौशी नागरिकांना कोण समजावून सांगणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
'ई टीव्ही भारत'ला अग्निशामक दल अधिकारी यांनी माहिती देताना सांगितले की, फटाक्यांमुळे प्रदूषण तर होतेच, परंतु जीवितहानी देखील होण्याचा धोका आहे. इको फ्रेंडली दिवाळीला प्राधान्य देऊ या, या अपेक्षेने सोलापुरातील पर्यावरणप्रेमींनी कागदी आकाशकंदील विक्री आणि खरेदीवर भर दिला आहे.
हेही वाचा -बेघरांना दिवाळीचे साहित्य भेट; सांगली पोलिसांनी स्तुत्य उपक्रम
- प्लास्टिकमुक्त दिवाळीसाठी कागदी आणि बांबूचे आकाशकंदील -