सोलापूरसध्या सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव Amrit Mahotsav of Freedom मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. 13 ऑगस्ट पासून 15 ऑगस्टपर्यंत हरघर तिरंगा, घरघर तिरंगा, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. तर 75 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सर्वत्र जनजागृती सुरू आहे. अनेक ठिकाणी राष्ट्रध्वजाचे वाटप ही करण्यात येत आहे, तर काही ठिकाणी शाळा महाविद्यालय संस्था यांच्या वतीने बाईक रॅली सायकल रॅली काढून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची जनजागृती सुरू आहे. सध्या उजनी धरण Ujani Dam 100 टक्के भरल्यामुळे भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याला आज 12ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास तिरंगी साज Ujani Dam Trirangi Saaj देण्यात आला आहे.
एक नयनरम्य दृश्य सध्या उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये ३०००० क्युसेक्स इतका विसर्ग सुरु आहे. या पडणाऱ्या पाण्याला तिरंग्याचा साज देण्यात आला आहे.त्यामुळे या तिरंगी पडणाऱ्या पाण्यामुळे एक नयनरम्य दृश्य निर्माण झाले आहे. अमृत महोत्सवाची एक वेगळेच वातावरण सोलापूरकरांना पाहावयास मिळत आहे.