महाराष्ट्र

maharashtra

Hanuman Chalisa Contraversy : 'महाराष्ट्रात असं कधी होत नव्हतं....', राणा दांपत्याच्या भूमिकेवर पवारांची जोरदार टीका

By

Published : Apr 25, 2022, 3:12 PM IST

Updated : Apr 25, 2022, 6:57 PM IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरोप प्रत्यारोप ( Maharashtra Alligation Politics ) राजकारण चांगलच तापलं आहे. तसेच नुकतंच राणा दाम्पत्यांकडून ( Navneet Rana ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा कार्यक्रम ( Hanuman Chalisa Contraversy ) ठेवण्यात आला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar Reaction On Hanuman Chalisa Row ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Hanuman Chalisa Contraversy
Hanuman Chalisa Contraversy

पुणे - राज्यातील राजकीय परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून बदलली असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप ( Maharashtra Alligation Politics ) तसेच थेट हल्ले होत असून राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. तसेच नुकतंच राणा दाम्पत्यांकडून ( Navneet Rana ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा कार्यक्रम ( Hanuman Chalisa Contraversy ) ठेवण्यात आला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar Reaction On Hanuman Chalisa Row ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'एखाद्या धर्मासंबंधी, धर्माच्या विचारासंबंधी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या काही भावना असतात. पण त्या भावना त्यांनी अंतकरणात, घरात ठेवाव्यात. पण आपण त्याचं प्रदर्शन करु लागलो. त्याच्या आधारे अन्य घटकांसंबंधी एक प्रकारचा द्वेष वाढेल, असे प्रयत्न केले तर त्याचे दुष्परिणाम समाजाला दिसू लागतात, असे शरद पवार म्हणाले. सिंबायोसिस संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाच्या रौप्यमहोत्सव वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.

प्रतिक्रिया

'महाराष्ट्रात असं कधी नव्हतं' -'एखाद्या धर्मासंबंधी, धर्माच्या विचारासंबंधी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या काही भावना असतात. पण त्या भावना त्यांनी अंतकरणात, घरात ठेवाव्यात. पण आपण त्याचं प्रदर्शन करु लागलो. त्याच्या आधारे अन्य घटकांसंबंधी एक प्रकारचा द्वेष वाढेल, असे प्रयत्न केले तर त्याचे दुष्परिणाम समाजाला दिसू लागतात. महाराष्ट्रात असं कधी होत नव्हतं. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात अशा वैयक्तिक अशा गोष्टी होत असून मला त्याचं आश्चर्य वाटतं', असं म्हणत पवार यांनी राणा दांपत्याच्या भूमिकेवर टीका केली आहे.

'ही महाराष्ट्राची खरी संस्कृती' -मी राज्यात खूप काम केलं. बाळासाहेब आणि माझ्यात जाहीर इतके मतभेद असायचे की शब्द एकमेकांबद्दल वापरायचो. काटकसर आम्ही दोघांनी कधीही केलं नाही.परंतु ती बैठक संपल्यावर संध्याकाळी मी त्याच्या घरी जायचो किंवा ते माझ्या घरी यायचे. कधीकधी तर जाहीर सभेत बोलल्यावर ज्येष्ठ नेत्यांच्या घरी एकत्र रात्र घालवायचो. पण सभेत काय झालं याची चर्चा देखील होत नव्हती. ही महाराष्ट्राची प्रथा आहे, पण दुर्दैवाने अलीकडे नाही त्या गोष्टी पाहायला मिळत आहे, असे देखील यावेळी पवार म्हणाले.

'राज्याची जुनी परंपरा आहे' -तुम्हाला धार्मिक कार्यक्रम करायचा असेल, तर तुमच्या घरी करु शकता. पण माझ्या दारात येऊन करतो म्हटल्यावर त्यामुळे माझ्याबद्दल आस्था असणाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली, तर दोष देता येणार नाही. अलीकडे या पद्धतीची भूमिका काहीजण मांडत आहे. पण लवकरच हे सर्व शांत होईल, अशी आशा करुया. आम्हा लोकांची भूमिका मतभेद कसा वाढणार नाही आणि राज्याची जुनी परंपरा आहे, ती कशी कायम राहील याची काळजी घेण्याचा प्रयत्न असेल, असं देखील यावेळी शरद पवारांनी म्हटले.

सर्वांनी बसून यावर मार्ग काढला पाहिजे -राज्यातील वीज प्रश्नांबाबत पवार यांना विचारलं असता, ते म्हणाले की देशातल्या अनेक राज्यांमध्ये वीजेचं संकट आहे. गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशात यावेळी वीजेची कमतरता आहे. प्रमाणापेक्षा जास्त वापर झाल्याने हे संकट आलं आहे. विशेषत: शेती आणि इतर गोष्टींसाठी मागणी वाढत चालली आहे. कच्च्या मालाचा तुटवडा आहे. सर्वांनी बसून यावर मार्ग काढला पाहिजे. तसंच राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. मुख्यमंत्री आपला बराच वेळ यावर मार्ग काढण्यासाठी देत असतात. परिस्थिती सुधारत आहे. असं देखील यावेळी पवार म्हणाले.

हेही वाचा -नवनीत राणांना तरुंगात आयोग्य वागणूक, महाराष्ट्राचं पुरोगामित्व संपलं - देवेंद्र फडणवीस

Last Updated :Apr 25, 2022, 6:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details