पुणेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा शुक्रवारी चांदणी चौकात अडविण्यात आला होता. संतप्त पुणेकरांनी तुमच्या ताफ्यामुळेच वाहतूक कोंडी झाल्याचा आरोप केला होता. या प्रकारामुळे दोन तास मोठी वाहतूक कोंडी झाली होती. हा प्रकार चांदणी चौकात नवा नसून गेली कित्येक वर्षे वाहतूक कोंडी होत असते, त्यातच पुलांची बांधकामे रखडल्याने यात गेल्या दोन वर्षांपासून भर पडली आहे. सातारा येथून मुंबईकडे येताना आज CM Eknath Shinde entered Chandni Chowk एकनाथ शिंदे पुण्यात दाखल झाले होते. शिवाय अधिकाऱ्यांची भेट घेत पुलासंदर्भात माहिती घेतली आहे. हा पूल 12 ते 15 सप्टेंबर दरम्यान पाडण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आज चांदणी चौकातील कामाची पाहणी केली.
आम्हा सर्वांचे जबाबदारी आहे पुणे मुंबई हायवेवर 100 मार्शल तैनात राहणार आहेत जे की वाहतुकीचे व्यवस्थापन करणार आहेत. तसेच पंधरा दिवसांमध्ये आपण या ठिकाणच्या नागरिकांना दिलासा देऊ, शेवटी नागरिकांना दिलासा देणे हे राज्य शासनाचे काम आहे. आम्हा सर्वांचे जबाबदारी आहे आणि तसे आदेश आम्ही सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहेत.
नागरिकांना दिलासा देऊ शनिवारी अधिकाऱ्यांना चांदणी चौकातील कामाची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. आज अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तसेच येत्या पंधरा दिवसांमध्ये या सर्व समस्या सोडवण्यात येतील, मागे जो काही झाला तो गोंधळ सोडून देऊ आणि आपण नवीन काहीतरी चांगले करूया आणि नागरिकांना दिलासा देऊया, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले आहेत.