पुणे - गेल्या काही दिवसांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबातील व्यक्तीवर तसेच त्यांच्या संबंधित विविध साखर कारखान्यांवर आयकर विभागाच्यावतीने छापेमारी करण्यात आली. जवळपास पाच ते सात दिवस ही चौकशी सुरू होती. याबाबत मध्यंतरी अजित पवार यांनी भाष्य करत म्हटलं होतं, की कोणता कारखाना कोणी कितीला विकला, का विकला याबाबत सविस्तर माहिती देईल आणि आज एकूण 65 कारखान्यांची यादी अजित पवार यांनी वाचवून दाखवली. काही जण पुन्हा पुन्हा तेच खोटे आरोप करून बदनामी करत आहेत. काही लोकांनी 25 हजार तर काही लोकांनी 10 हजार कोटींचे घोटाळे झाल्याचे आरोप केले. त्यावर वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी चौकशी देखील केली. परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही, असे अजित पवार म्हणाले.
राज्यातील साखर कारखाने विकले गेले. त्यावर कोणीही चर्चा करत नाही. बोलायच नाही. 64 वेग-वेगळे कारखाने काही कंपन्यांनी विकत घेतले. तर काहींनी विकत घेऊन दुसऱ्याला चालवायला दिले, असल्याचेही यावेळी अजित पवार यांनी सांगितले.
बेईमानी केली असेल तर गुन्हा दाखल करावा -
जरंडेश्वरबद्दल सातत्याने माझ्या घरातील व्यक्तींचा उल्लेख केला जात आहे. त्याबद्दल मला महाराष्ट्रातील नागरिकांना एक गोष्ट स्पष्ट सांगायची आहे की ज्याच्यामुळे कारखान्यांचे नुकसान झाले ते पुढे येऊन काही बोलत नाही. बदनामी करण्यासाठी जनतेची दिशाभूल करण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया सुरू आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा बँकेने जरंडेश्वर सहकारी कारखान्याचे टाकलेले पैसे न भरल्याने कारखाना हा ताब्यात घेतला आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना विकत घेण्यासाठी अनेक निविदा आल्या होत्या. या कारखान्यात कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही, असा उच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. जर कोणी बेइमानी केली असेल तर त्यावर गुन्हा दाखल करावा, असे आवाहन देखील यावेळी अजित पवार यांनी केले.
कारखाने चांगले चालवायला मॅनेजमेंट चांगली लागते -