पुणे -भारताची राज्यघटना ही जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना ( Indian constitution best in world ) आहे. या राज्यघटनेचे वैशिष्ट्य असे आहे की भारतामध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक उतरंड असलेली आर्थिक व्यवस्था शेकडो वर्षापासून अस्तित्वात आहे. याच्यातून समाजातील एका मोठ्या विभागाला दलित शोषित अस्पृश्य समजले जाते. त्यांच्या विकासाचा आणि त्यांना सर्वसाधारण समाजाच्या राजकीय पातळीवर आणणे गरजेचे होते, असे ज्येष्ठ कामगार नेते तथा अर्थविषयक अभ्यासक अजित अभ्यंकर ( Ajit Abhyankar on Indian constitution ) यांनी सांगितले.
ज्येष्ठ कामगार नेते तथा अर्थविषयक अभ्यासक अजित अभ्यंकर प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये ( characteristics of Indian constitution ) आणि त्यामधील महत्त्वाच्या दुव्यांविषयी ईटीव्ही भारतशी संवाद साधला. अजित अभ्यंकर म्हणाले, की स्वतंत्र भारताला सर्वांचा सामावेश अशी राज्यघटना तयार करायची होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली राज्यघटनेची तयार झाली. यामध्ये राजकीय समाज म्हणून भारतीयांची राज्यघटना तयार केली. यामध्ये समुदाय जरी वेगळे असले तरी राजकीय पातळीवर सरकार व प्रशासन व्यवस्था म्हणून सर्वांना एक समाज म्हणून आपण एकत्रित केले.
हेही वाचा-Kangana Ranaut VS Javed Akhtar Case : अभिनेत्री कंगना रनौतची मुंबई सत्र न्यायालयात धाव
घटनेमध्ये आंतरिक व परंपरागत उतरंड
हे सर्व करत असताना त्यांच्यामध्ये असलेल्या आंतरिक व परंपरागत उतरंड आहेत. त्याचा सुद्धा काही संदर्भ असणे आवश्यक असते. यामध्ये काही विशेष संधी ह्या अत्यंत आवश्यक आहे. हे तत्त्व भारतीय घटनेमध्ये उत्तम प्रकारे सामावले गेले. हे सर्व कसे झाले तर आपण याची मुळे तपासून पाहिले तर त्याचे मूळ आपल्याला पुणे करारामध्ये आढळत असल्याचे मत अजित अभ्यंकर यांनी व्यक्त केले.
हेही वाचा-Nitin Raut On Hedgewar : सरसंघचालक हेडगेवारांनी सुभाषचंद्र बोस यांच्या सचिवाला भेट नाकारली होती; ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा दावा
राज्यघटनेला आणि पुणे कराराला जोडणारा समान दुवा म्हणजे पुणे करार-
पुणे करार हा भारतीय घटना समजून घेण्याची पार्श्वभूमी ( Ajit Abhyankar on Pune Pact ) आहे. त्यामुळे पुणे करार महत्त्वाचा आहे. तसेच भारतीय राज्यघटनेला आणि पुणे कराराला जोडणारा समान दुवा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये 24 सप्टेंबर 1932 रोजी पुणे करार झाला होता. येरवड्याच्या तुरुंगात हा करार झाला होता. या कराराची जी मूलभूत तत्त्वे होती. साधारण ती मूलभूत तत्वे थोडे फेरफार करून स्वातंत्र्यानंतर आपण जी राज्यघटना तयार केली यामध्ये तशीच ठेवली गेल्याची निरीक्षणे अभ्यंकर यांनी सांगितली आहेत.