नागपूर -ओबीसी भाजपाचा आत्मा आहे. या सरकारने कितीही मुस्कटदाबी केली तरी आवाज दाबू शकणार नाही. ओबीसीच्या 346 जाती राजकीय हक्कांपासून दूर झाल्या आहेत. जे मध्यप्रदेशने केले, ते काम हे झोपलेले महाविकास आघाडी सरकार करू शकले नाही. या कटकारस्थानामागे अमोल मिटकरीचे सरदार शरद पवार असल्याची टीका भाजपा नेते अनिल बोंडेंनी केली आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत ( Anil Bonde Criticized Sharad Pawar ) होते.
अनिल बोंडे म्हणाले की, भाजपा ओबीसींसाठी ( Obc Reservation ) संघर्ष करेल. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर पहिल्याच दिवशी एम्पिरिकल डेटा गोळा करा, असे सांगितले होते. तेव्हा केंद्राकडे बोट दाखवले जात होते. यांचे पाप महाराष्ट्राला भोगावे लागत असल्याचीही बोचरी टीका महाविकास आघाडीवर बोंडेंनी केली आहे.