मुंबई - शिवसेनेचा वाद न्यायालयात गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पाच न्यायाधीशांचे घटनापीठ स्थापन केले आहे. आज बुधवार (दि. 7 सप्टेंबर)रोजी सर्वोच्च न्यायालयात खंडपीठाचे अध्यक्ष चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी झाली. दरम्यान, २७ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी यावर भाष्य केले. सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाने चिन्ह गोठवण्याबाबत याचिका दाखल केली. मात्र, मुळात या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. (Amit Shah criticizes Uddhav Thackeray) तोपर्यंत निर्णय घेता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने देखील २७ सप्टेंबर पर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये असे आदेश दिले आहेत. परंतु, ५ वर्ष निर्णय लागणार नाही, असे विधान शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले यापूर्वी बोलले होते. आता देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी शिंदे गट हीच खरी शिवसेना असे वक्तव्य केले आहे. न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना केंद्रीय गृहमंत्र्यांनी असे वक्तव्य करत आहेत. या सर्व विधानांची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घ्यायला हवी. शिवसेनेकडून ही यासंदर्भात याचिका दाखल केली जाईल, असे शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी सांगितले.
जनाची नाही मनाची तरी लाज ठेवा - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत येऊन शिवसेनेला जमीन दाखवू असे भाषण ठोकले. बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहोत. (What did Amit Shah say about Uddhav Thackeray) आमचीच शिवसेना असा कांगावा करणारे दाढी कुरवाळत होते. किमान जनाची नाही मनाची तरी लाज ठेवा, असा हल्लाबोल शिवसेना नेते सावंत यांनी केला. तसेच, शिंदे यांचे वर्तन संपूर्ण महाराष्ट्राने ते बघितले आहे. जनता सुज्ञ आहे, ती योग्य न्याय निवडा करेल असेही सावंत म्हणाले.