मुंबई -आयएनएस विक्रांत युद्धनौका ( INS Vikrant Case ) भंगारात जाऊ नये म्हणून 2013 साली भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैयांनी जनतेकडून पैसा गोळा केला. त्यातून जमा झालेली रक्कम किरीट सोमैयांनी भारतीय नौदल किंवा आमफोर्स तेथे देणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी तसे न करता, जमा केलेला सर्व पैसा पक्षाला दिला. हे आक्षेपार्ह असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त ( Sharad Pawar On Kirit Somaiya ) केले. ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
घरावर हल्ल्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांना दोष नाही - शरद पवार म्हणाले की, आपल्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. पण, या हल्ल्यासाठी आपण कधी एसटी कर्मचाऱ्यांना दोषी ठरवत नाही. एसटी कर्मचाऱ्यांनी नेतृत्व चुकीचे निवडे. ती व्यक्ती रोज माझे नाव घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या परिस्थितीबाबत आपण जबाबदार असल्याची टीका करत होती. या परिस्थितीला आपण जबाबदार असल्याचा एसटी कर्मचाऱ्यांच्या डोक्यात टाकण्यात आल. त्यामुळे कामगारांना आंदोलनासाठी रस्त्यावर आणणारे जबाबदार आहेत. घरावर हल्ला प्रकरणी आपण एसटी कर्मचाऱ्यांना दोषी मानत नाही. तसेच, घरावर हल्ल्याप्रकरणी ज्या एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्याबाबत सर्वस्वी निर्णय संबंधित खात्याचे प्रमुख म्हणून अनिल परब यांनी घेतला आहे. तसा निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार असल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.