महाराष्ट्र

maharashtra

MNS Workers Meeting राज ठाकरेंकडून नुपूर शर्मांच्या वक्तव्याचे समर्थन, कार्यकर्ता मेळाव्याला केले संबोधन

By

Published : Aug 23, 2022, 8:30 PM IST

Updated : Aug 23, 2022, 9:05 PM IST

मनसे प्रमुख राज ठाकेर
मनसे प्रमुख राज ठाकेर ()

वादग्रस्त वक्तव्यांनंतर नुपूर शर्मांविरोधात देशभर वाद निर्माण झाला. नुपूर शर्मांवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुपूर शर्मा यांचे समर्थन केले आहे. MNS Workers Meeting आज मंगळवार दि. 23 ऑगस्ट रोजी कार्यकर्ता मेळावा झाला त्यामध्ये ते बोलत होते. 'झाकीर नाईकला माफीची मागणी का करत नाही, अस म्हणत जुन्या वादाला तोंड फोडले आहे.

मुंबई - पैगंबर मोहम्मद यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नुपूर शर्मांविरोधात देशभर वाद निर्माण झाला. नुपूर शर्मांवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुपूर शर्मा यांचे समर्थन केले आहे. Raj Thackeray Address to the Worker Meeting आज मंगळवार दि. 23 ऑगस्ट रोजी कार्यकर्ता मेळावा झाला त्यामध्ये ते बोलत होते. 'झाकीर नाईकला माफीची मागणी का करत नाही, अस म्हणत जुन्या वादाला तोंड फोडले आहे.

कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकेर

झाकीर नाईक प्रकरणआपल्या सडेतोड वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या राज यांनी आज कार्यकर्त्यांच्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. ते म्हणाले की, जेव्हापासून नुपूरचे वक्तव्य आले आहे, तेव्हापासून देशात बरेच राजकारण होत आहे. नुपूरला कोणीही पाठिंबा देत नाही. झाकीर नाईकनेही असेच म्हटले आहे. मात्र, त्यांच्याकडून माफीची मागणी कोणी का करत नाही, नुपूरवर माफी मागण्यासाठी दबाव टाकण्यात आला. नाईक यांच्याकडून माफीचे आवाहन करण्यात आले नाही. नुपूर जे बोलल्या होत्या, नाईकही तेच बोलला आहे. असही ते म्हणाले आहेत.

भाजपमधून हकालपट्टीविशेष म्हणजे प्रेषित मोहम्मद वादानंतर देशात अनेक आंदोलने झाली होती. नुपूर यांना भाजपने पक्षातून निलंबित केले होते. या प्रकरणी नुपूरला माफी मागावी लागली. मात्र, या काळात त्यांच्यावर देशातील अनेक न्यायालयात खटले दाखल झाले. त्या सर्व प्रकरणांची दिल्लीत नोंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. दरम्यान, हिप बोनची शास्त्राकिया झाल्याने मागचे दोन महिने राजकारणापासून दूर असलेले राज ठाकरे प्रदीर्घ काळानंतर आता पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. आज त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र आणत त्यांचा मेळावा घेतला व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता मनसेने रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या या प्रयत्नाला नक्की कितपत यश येते हे निवडणुकीच्या निकालातच स्पष्ट होईल.

हेही वाचा -जिवंत गांधी खटकणाऱ्यांना मारलेले गांधी जास्तच त्रास देताहेत, तुषार गांधींंचा भाजपला टोला

Last Updated :Aug 23, 2022, 9:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details