महाराष्ट्र

maharashtra

राजभवनात बोगस पीएचडी डिग्रीचे वाटप?, मनीषा कायंदे यांचा आरोप, उदय सामंतांनी दिले चौकशीचे आदेश!

By

Published : Mar 22, 2022, 5:02 PM IST

राजभवनात झालेला कार्यक्रमात एका संस्थेने बोगस पीएचडी डिग्रीचे वाटप केले असल्याचा आरोप मनीषा कायंदे यांनी केला. याबाबत अधिक चौकशीचे आदेश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले ( Uday Samant orders to investigate matter) आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांना अंधारात ठेऊन एखाद्या संस्थेने असे कृत्य केले आहे का ? याबाबत राज्यपाल कार्यालयाशी संपर्क केला जाणार असल्याचे उदय सामंत यांनी विधानभवनात पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

Governor Bhagat Singh Koshyari
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई - राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांच्याकडून एका संस्थेने बोगस पीएचडीचे वाटप करून घेतले असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना आमदार मनीषा कायंदे ( Shiv Sena MLA Manisha Kayande Allegations ) यांनी केला आहे. काल 21 मार्च रोजी राजभवनात झालेला कार्यक्रमात एका संस्थेने बोगस पीएचडी डिग्रीचे वाटप केले असल्याचा आरोप मनीषा कायंदे यांनी केला. याबाबत अधिक चौकशीचे आदेश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ( Uday Samant orders to investigate matter) दिले आहेत. राज्यपाल यांना अंधारात ठेऊन एखाद्या संस्थेने असे कृत्य केले आहे का ? याबाबत राज्यपाल कार्यालयाशी संपर्क केला जाणार असल्याचे उदय सामंत यांनी विधानभवनात पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

उदय सामंतांनी दिले चौकशीचे आदेश -

पीएचडी डिग्रीचे वाटप अश्या संस्थेने केले आहे. ज्या संस्थेला पीएचडी डिग्री देण्याचा अधिकार नाही. मात्र राज्यपालांना अंधारात ठेऊन असे कृत्य त्या संस्थेने केले असल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत चौकशी करून त्याची माहिती राज्यपालांना दिली जाईल. तसेच त्या संस्थेवर कारवाई देखील केली जाईल असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा -Nitin Gadkari in Parliament : नितीन गडकरींचा खासदारांना सवाल, किती जणांनी दिली ड्रायव्हिंग लायसन्सची चाचणी, लोकसभेत पसरली शांतता

ABOUT THE AUTHOR

...view details