महाराष्ट्र

maharashtra

Rohit Sharma Press Conference पाकिस्तानच्या भारत दौऱ्याच्या प्रश्नावर रोहित शर्माने दिले हे मजेदार उत्तर

By

Published : Aug 28, 2022, 1:00 PM IST

आशिया चषक 2022 Asia cup 2022 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी देश पाकिस्तानशी होणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्याआधी पत्रकार परिषदेत रोहित शर्माने Rohit Sharma press conference अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान एका पत्रकाराने रोहित शर्माला टीम इंडियाच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत प्रश्न विचारला, ज्याला भारतीय कर्णधाराने मजेशीर उत्तर दिले.

Rohit Sharma
रोहित शर्मा

दुबई आशिया कप 2022 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार IND vs PAK आहे. 28 ऑगस्ट (रविवार) रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याची जगभरातील क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकादरम्यान या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने India vs Pakistan आले होते, तेव्हा बाबर आझमच्या संघाने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता. आता भारतीय संघाला त्या पराभवाचा बदला घेण्याची मोठी संधी आहे. या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्मा Captain Rohit Sharma press conference काय म्हणाला घ्या जाणून.

या सामन्याच्या पूर्वसंध्येला टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा Captain Rohit Sharma पत्रकार परिषदेला उपस्थित होता. पत्रकार परिषदेत रोहित शर्माने भारतीय संघाची रणनीती, प्लेइंग-11 अशा अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान एका पत्रकाराने रोहित शर्माला टीम इंडियाच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत प्रश्न विचारला. त्या पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नाला रोहित शर्माने असे उत्तर दिले की पत्रकार परिषदेत उपस्थित लोक हसू लागले.

रोहित शर्मा Rohit Sharma statement म्हणाला, 'माझ्याकडे या प्रश्नाचे उत्तर असते तर मी नक्की उत्तर दिले असते. काय करावे आणि काय करू नये हे ही बोर्ड मंडळे ठरवतात. हे आपल्या हातात नाहीत. समोर जे काही टूर्नामेंट दिसतो ते खेळायला आपण तिथे पोहोचतो. आम्हाला जिथे पाठवले जाईल तिथे आम्ही खेळू. हा खूप अवघड प्रश्न आहे. बोर्डाने ठरवले तर आम्ही खेळू.

2008 नंतर टीम इंडिया पाकिस्तानला गेलेली नाही

2008 पासून भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा Indian cricket team tour of Pakistan केलेला नाही. असो, राजकीय आणि राजनैतिक संबंधांमुळे दोन्ही देशांचे संघ अद्याप द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत. 2012-13 मध्ये भारतीय भूमीवर दोन्ही देशांदरम्यान शेवटची द्विपक्षीय मालिका झाली होती. तेव्हा पाकिस्तानने तीन एकदिवसीय आणि दोन टी-20 सामन्यांसाठी भारताचा दौरा केला होता. पाकिस्तान संघाने एकदिवसीय मालिकेत 2-1 असा विजय मिळवला, तर टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली होती.

दोन्ही देशांच्या खेळाडूमधील संवाद

मैदानावर जरी दोन्ही संघ आमनेसामने येणार असले तरी मैदानाबाहेरील खेळाडूंमधील संवाद India Pakistan team players Relationship खूपच चांगला झाला आहे. पीसीबीने शनिवारी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा आणि बाबर आझम दीर्घकाळ संभाषण करताना दिसले. काही दिवसांपूर्वी भारतीय फलंदाज विराट कोहली आणि बाबर आझमच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीही अनेक भारतीय खेळाडूंशी दीर्घकाळ संभाषण करताना दिसला होता.

हेही वाचा -Asia Cup 2022 IND vs PAK भारत-पाक आज महामुकाबला, सामन्याबद्धल जाणून घ्या सर्वकाही

ABOUT THE AUTHOR

...view details