शिवरायांना घडवण्यात जिजाऊ मातेचंच योगदान, काही लोक संभ्रम निर्माण करतात;पवारांकडून योगींच्या वक्तव्याचा समाचार
Published : Feb 19, 2024, 8:47 PM IST
पुणे : देशामध्ये यादव आणि मोगलासह अनेक राजवटी तयार झाल्या आहेत. पण, छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे भोसल्यांचं राज्य नाही, तर ते रयतेचं राज्य होतं. त्यांनी आपल्या मावळ्यांना, शेतकऱ्यांच्या पीक पद्धतीला एक दिशा दिली. त्यामधूनच एक आदर्श घालून दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यात जिजाऊ मातेचं मोठं योगदान आहे. मात्र, इतर काही लोक इतरांची नावे घेत आहेत. हा चुकीचा पायंडा पाडण्याचा काम आहे, असल्याची टीका केली. ते आज सोमवार (दि. 19 फेब्रुवारी) रोजी सकाळी पुण्यातील जीएसपीएम कॉलेजच्या प्रांगणात आयोजीत कार्यक्रमात बोलत होते. यावेळी शिवजयंती साजरी करण्यासाठी आलेले मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरू होते, असा दावा केला होता.